उद्दिष्ट्ये/तत्वे

शिव संकल्प🚩 संस्थेचे उध्दिष्टये काय आहेत?

संस्थेचे मुख्य उध्दिष्टये खालील प्रमाणे आहेत:

पहिल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या ४२२ गड किल्ले गड किल्ल्यांची पुनर्बांधणी आणि संवर्धन केले जाईल.
दुसऱ्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज🚩 घराणे, शिव मावळे आणि शिव योद्धे यांच्या जयंती स्थळांचे संवर्धन केले जाईल.
तिसऱ्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज🚩 घराणे, शिव मावळे आणि शिव योद्धे यांच्या समाधी स्थळांचे संवर्धन केले जाईल.
चौथ्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज🚩 घराणे, शिव मावळे आणि शिव योद्धे यांच्या पत्नींच्या वीरगळ स्थळांचे संवर्धन केले जाईल.
पाचव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज🚩 घराणे, शिव मावळे आणि शिव योद्धे यांच्या पत्नींच्या वीरगळ स्थळांचे संवर्धन केले जाईल.
सहाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या ४२२ गड किल्ले किल्ल्यांवरील मंदिरांचा विकास केला जाईल.
सातव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या ४२२ गड किल्ले किल्ल्यांच्या पायथ्याच्या परिसराचा विकास केला जाईल.
आठव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या स्मरणार्थ ४२२ गड किल्ले यांना जोडणारी पर्यटन योजना सुरु केली जाईल.
नवव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या स्मरणार्थ ४२२ गड किल्ल्यांवर शिवकाल उत्सव सुरु केली जाईल.
दहाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज🚩 घराण्यातील विस्थापित वंशज यांना वारसा निधी वाटप केले जाईल.
अकराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचे शिव मावळे आणि शिव योद्धे यांचे विस्थापित वंशज यांना वारसा निधी वाटप केले जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निवडक गड किल्ल्यांचे पुनर्विकास करण्याचे शिवकार्य🚩 एका विशेष देणगी कार्यक्रमाद्वारे हाती घेण्यात येईल.

गड किल्ले जपण्याची खरी जबाबदारी सरकारची नसून जनतेची आहे, त्यामुळे जनतेतूनच दर वर्षी देणगी जमा करून जनतेला सभासद बनवायचे व गड किल्ले पुनर्विकास आणि संवर्धन नियमित चालू ठेवायचे. त्यासाठी नियमित देणगी गोळा करणे, गड किल्ले पुनर्विकास आणि संवर्धन संस्था यांना देणगी निधी देणे व त्यांच्या कामांवर देखरेख ठेवली जाईल.


शिव संकल्प🚩 संस्थेचे तत्व काय आहेत?

शिव संकल्प🚩 संस्थेचे मुख्य तत्व गड किल्ल्यांचा पुनर्विकास आणि संवर्धन करणे.
शिव संकल्प🚩 संस्थेने स्वयं मेहनत तसेच जनतेच्या सहकार्यातून गड किल्ल्यांच्या पुनर्विकास आणि संवर्धन करणे
शिव संकल्प🚩 संस्थेने गड किल्ल्यांच्या पुनर्विकास आणि संवर्धन करताना पारदर्शिता ठेवणे.
शिव संकल्प🚩 संस्थेने गड किल्ल्यांच्या पुनर्विकास आणि संवर्धन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.
शिव संकल्प🚩 संस्थेचे सर्व स्थायी सभासद आणि अस्थायी सभासद एकत्र काम करतील, तसेच शिवकार्य करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करतील.
शिव संकल्प🚩 संस्था "शिवकार्य" करण्यासाठी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांच्या पुनर्विकास आणि संवर्धनासाठी स्थापलेली आहे.
शिव संकल्प🚩 संस्थेचे सर्व स्थायी सभासद यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांच्या पुनर्विकास आणि संवर्धनासाठी भारत देशात फक्त विशेष ठिकाणी प्रवास करावा लागेल.
शिव संकल्प🚩 संस्थेचे सर्व अस्थायी सभासद यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांच्या पुनर्विकास आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्यात फक्त विशेष ठिकाणी प्रवास करावा लागेल.


शिव संकल्प🚩 संस्थेचे कार्य काय आहेत?

१. देणगीचा निधी जमा करणे.
२. संवर्धन स्थळांचे छायाचित्र काढणे, चलचित्र काढणे, रेखाटन करणे (Set of drawing) आणि मॅपिंग करणे.
३. गड किल्ले पुनर्विकास आणि संवर्धन प्रकल्पाची माहिती आणि पुरावे जुळवणे.
४. गड किल्ले पुनर्विकास आणि संवर्धन प्रकल्पाचा कृती आरखडा तयार करणे.
५. छत्रपती शिवाजी महाराज घराणे आणि परिवार यांची कृती आराखड्यासह परवानगी घेणे.
६. स्थानिक सरकारी यंत्रणांची कृती आराखड्यासह लेखी परवानगी घेणे.
७. राज्य/केंद्र सरकारी यंत्रणांची कृती आराखड्यासह लेखी परवानगी घेणे.
८. कृती आराखड्यासह जबाबदारीचे वाटप करणे.
९. कार्यस्थळाचे वाटप करणे.
१०. साधन सामग्रीचे आयोजन करणे.
११. गड किल्ल्यांची स्वच्छता व जरुरी कार्य करणे.
१२. गड किल्ल्यांचे पुनर्विकासाचे कार्य करणे.
१३. गड किल्ल्यांचे संवर्धनाचे कार्य करणे.
१४. कृती आराखड्याप्रमाणे गड किल्ल्यांचे पुनर्विकास आणि संवर्धनाच्या कार्यावर देखरेख ठेवणे.
१५. कृती आराखड्याप्रमाणे उजळणी व आवश्यक नोंदी करणे.
१६. कार्यांचा शेवट करणे.


शिव संकल्प🚩 संस्था कोणती अंमलबजावणी करणार आहे?

छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या ४२२ किल्ल्यांचा पुनर्विकास आणि संवर्धन करणे.
छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या ४२२ किल्ल्यांचा सुवर्ण शिवकाळ परत आणणे.
छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या ४२२ किल्ल्यांचा इतिहास लोकांना सांगणे.
छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या ४२२ किल्ल्यांचा पुनर्विकास आणि संवर्धनाचे महत्व काय आहे? याची लोकांना माहिती देणे.
छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या ४२२ किल्ल्यांचा पुनर्विकास करण्याची गरज का आहे? याची लोकांना माहिती देणे.
छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या ४२२ किल्ल्यांचा संवर्धन करण्याची गरज का आहे? याची लोकांना माहिती देणे.
छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांच्या ४२२ किल्ल्यांचा पुनर्विकास आणि संवर्धनाचे फायदे काय आहेत? याची लोकांना माहिती देणे.
छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचे घराणे यांची लोकांना माहिती देणे.
छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचे परिवार यांची लोकांना माहिती देणे.
छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचे वंशज यांची लोकांना माहिती देणे.
छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचे शुर अंगरक्षक, महान योद्धे, मंत्री, मित्र आणि मावळे यांची लोकांना माहिती देणे.
छत्रपती शिवाजी महाराज🚩 यांचे शिवकालीन शूर रणरागिणी महिला यांची लोकांना माहिती देणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

|| शिवराज्याभिषेक गीत ||

|| शिवगर्जना गारद ||

Popular Posts