छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणाची माहिती :
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० यादिवशी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. राजमाता जिजाबाईं यांच्या पोटी बाल शिवाजी जन्मले, शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे "शिवाजी" असे नामकरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्यशासनाचे आणि युद्ध कौशल्याचे धडे राजमाता जिजाऊ यांच्या कडून मिळाले. अगदी लहानपणापासून राम आणि कृष्ण यांच्या कथा ऐकून अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध महाराजांच्या मनात चीड निर्माण झाली.
पहिली गुरू आई आणि दुसरे गुरू दादोजी कोंडदेव यांच्या सानिध्यात व संस्कारांमधे महाराजांचे बालपण अतिशय उत्तम रितीने गेले. दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराज यांना युध्दकौशल्यात आणि नितीशास्त्रात पारंगत केले.
राजमाता जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराज यांना तलवारबाजी, घोडयावर स्वार होणे यातही तरबेज करत होत्या.
मुघल साम्राज्य आपल्यावर करत असलेल्या अन्यायाची जाणीव बाल शिवाजी यांना झाली आणि या अत्याचारातून आपल्या जनतेला मुक्त करण्याचा वसा त्यांनी बालपणीच उचलला.
छत्रपती शिवाजी महाराज यांना सनय हि पदवी कधी व कशी मिळाली?
आपल्या लेकराला दिगंत उंचीला पोहोचवण्यासाठी आपल्या जीवाची कुरवंडी कळणारे असे एक वडील म्हणजे शहाजी महाराज !
मोगल आणि आदिलशाही फौजांना आपल्या तलवारीच्या पात्यावर साडे तीन वर्षे नाचवल्यावर शहाजीराजांना माघार घ्यावी लागली. १६२३ ते १६३७ ही पंधरा वर्षे अत्यंत धामधुमीची गेली होती.
कर्नाटकात गेल्यावर त्यांना काहीसं स्थैर्य लाभलं. शांतता लाभली. या शांततेच्या काळात त्यांनी शिवरायांना एका राजाला राज्यकारभारासाठी जे जे आवश्यक त्याचं शिक्षण दिलं.
परमानंदाच्या शिवभारतवरुन डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेल्या "शिवराय : शिक्षण आणि संस्कार", या पुस्तकात दिलं आहे की शिवराय वयाच्या १२ व्या वर्षी जिजाऊ साहेबांबरोबर पुण्याला आले, तेव्हा ते सनय होऊन आले होते. आणि 'सनय'चा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर ते "१४ विद्या आणि ६४ कलांमध्ये पारंगत" होऊन आले होते.
शहाजी महाराजांनी शिवरायांना पुण्याला पाठवलं तेंव्हा राजा ही पदवी दिली. आपल्या पुणे-सुपे-चाकण या जहागिरीतल्या बावीस गावांचा पोटमोकासा शिवरायांच्या नावावर करुन दिला. सोबत मंत्री, मुत्सद्दी दिलेत, सैन्य दिलं, खजिना दिला. भगवा झेंडा दिला आणि राजमुद्राही दिली.
प्राचीन हिंदू धर्मग्रंथात अनादी काळापासून १४ विद्या आणि ६४ कला वर्णन केलेल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळवलेली सनय या पदवीतील १४ विद्या खालीलप्रमाणे आहेत:
वेद ४
उपवेद ४
वेदांग ६
४ वेद खालील प्रमाणे आहेत:
ऋग्वेद: ३५०० वर्षांपेक्षा जास्त प्राचीन असलेल्या ऋग्वेदत १०१७ सूक्त आहेत असून हे जगातील सर्वात जुने शास्त्र मानल जाते.
यजुर्वेद: यज्ञ आणि त्या बाबतच्या सर्व विधी बाबत यजुर्वेदात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तसेच यात तत्वज्ञानाचे वर्णन असून . मूलभूत ज्ञान, म्हणजे रहस्य ज्ञान, ब्राह्मण, आत्मा, देव ह्या बाबत यात सखोल ज्ञान ज्ञात आलेले आहे.
सामवेद:सर्वात महत्वाचा असा हा वेद असून चार ही वेदात ह्यास जास्त महत्व आहे चार वेदांमध्ये सामवेद. सामवेद भारताच सर्वात जुन शास्त्र आहे तसेच हा सर्वात लहान ग्रंथ आहे.
अथर्वेदः हिंदू धर्मातील सर्वात पवित्र व सर्वोच्च मानल्या जाणार्या ग्रंथात व वेदात अथर्वेद चौथ्या क्रमांक वर मानल जाते.
४ उपवेद माहिती खालीलप्रमाणे आहे:
अर्थशास्त्र: हा एक अतिशय जुना भारतीय ग्रंथ आहे असून शासन, आर्थिक आणि लष्करी ह्या विषया बाबत तसेच रणनीतीबद्दल सखोल महिरी देतो, ज्ञान प्रदान करतो -कौटील्या किंवा आपण यास विष्णुगुप्त म्हणून सुद्धा ओळखतो यांचं यात योगदान आहे.
धनुर्वेद: धनुष्य आणि ज्ञान शब्दावरून ह्या वेदाला ओळखलं जाते.
गंधर्ववेद: संगीत नृत्य आणि कला वर आधारित हा भारतीय ग्रंथ आहे.
आयुर्वेदः आयुर्वेद बाबत लोकांना सर्वात जास्त माहिती असून आयुर्वेदिक हा पारंपारिक वैद्यकीय ज्ञानाबाबत माहिती देत असतो.
६ वेदांगे खालील प्रमाणे आहे:
१ व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.
२ ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.
३ निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.
४ कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र.
५ छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान.
६ शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.,न्याय,मीमांसा, पुराणे,धर्मशास्त्र.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळवलेली सनय या पदवीतील ६४ कला खालील प्रमाणे आहेत:
१ पानक रस तथा रागासव योजना – पेय व मदिरा तयार करणे.
२ धातुवद- कचे पक्की , धातू व मिश्रधातू वेगळे करणे.
३ दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ समजणे.
४ आकर ज्ञान – खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५ वृक्षायुर्वेद योग- उपवन, उद्यान बनविणे.
६ पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७ वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८ व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे ज्ञान असणे.
९ वैजापिकी विद्याज्ञान- विजय मिळविणे.
१० शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली समजणे.
११ अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान घेणे.
१२ वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधकामा बद्दल.
१३ बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४ चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५ पुस्तकवाचन- पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६ आकर्षण क्रीडा- आकर्षित करणे.
१७ कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला सुंदर बनविणे.
१८ हस्तलाघव- हस्तकौशल्य व कलेची कामे करणे.
१९ प्रहेलिका – कोटी, उखाणे वा काव्य हयातून प्रश्न विचारणे.
२० प्रतिमाला – अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१ काव्यसमस्यापूर्ती – अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२ भाषाज्ञान – देशी-विदेशी भाषा ज्ञान असणे.
२३ चित्रयोग – चित्रे काढून रंगविणे.
२४ कायाकल्प – वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५ माल्यग्रंथ विकल्प – वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.
२६ गंधयुक्ती – सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७ यंत्रमातृका – विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८ अत्तर विकल्प – फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९ संपाठय़ – दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३० धारण मातृका – स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१ छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२ वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३ मणिभूमिका – भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४ द्यूतक्रीडा – जुगार खेळणे.
३५ पुष्पशकटिका निमित्त ज्ञान – प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
३६ माल्यग्रथन – वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७ मणिरागज्ञान – रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८ मेषकुक्कुटलावक – युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९ विशेषकच्छेद ज्ञान – कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४० क्रिया विकल्प – वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१ मानसी काव्यक्रिया – शीघ्र कवित्व करणे.
४२ आभूषण भोजन – सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३ केशशेखर पीड ज्ञान – मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४ नृत्यज्ञान – नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५ गीतज्ञान – गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
४६ तंडुल कुसुमावली विकार – तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७ केशमार्जन कौशल्य – मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८ उत्सादन क्रिया – अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९ कर्णपत्र भंग – पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५० नेपथ्य योग – ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१ उदकघात – जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२ उदकवाद्य – जलतरंग वाजविणे.
५३ शयनरचना – मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४ चित्रकला – नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५ पुष्पास्तरण – फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६ नाटय़अख्यायिका दर्शन – नाटकांत अभिनय करणे.
५७ दशनवसनांगरात – दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८ तुर्ककर्म – चरखा व टकळीने सूत काढणे.
५९ इंद्रजाल – गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६० तक्षणकर्म – लाकडावर कोरीव काम करणे.
६१ अक्षर मुष्टिका कथन – करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२ सूत्र तथा सूचीकर्म – वस्त्राला रफू करणे.
६३ म्लेंछीतकला विकल्प – परकीय भाषा ठाऊक असणे.
६४ रत्नरौप्य परीक्षा – अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.
२५ जुलै १६४८ शहाजीराजे भोसले यांना कैद🚩:
शहाजीराजे हे जिंजीच्या मोहिमेवर होते. शहाजीराजांची फौज झोपेतून जागी होऊन तलवार, घोडा करीत आरडाओरडा करू लागली. स्वतः शहाजीराजेही या सगळ्या कोलाहलामुळे खडबडून जागे झाले. आता त्यांना आपण त्या खबरगीरावर विश्वास ठेवला नाही याचा शहाजीराजांना पश्चाताप होऊ लागला. पण लागलीच भानावर येत शहाजीराजांनी ढाल तलवार उचलली आणि घोड्यावर मांड ठोकली. शहाजीराजांच्या पदरी असलेला खंडोजी पाटीलही तलवार घेऊन रणांगणात उतरला. साक्षात खंडोबाच संचारला होता जणू त्याच्या अंगात! इतक्या विलक्षण वेगानी हा बहाद्दर तलवार घुमवत होता की, वेदनेची जाणीव व्हायच्या आतच शत्रूचे मस्तक धडावेगळे होत होते.......पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे धार्मिक गुरु म्हणून समर्थ श्री रामदास स्वामी यांनी महाराजांना केलेला अमूल्य उपदेशचा इतिहासात केलेला उल्लेख : शत्रू आणि मित्र ओळखण्यासाठी पुरेसा वेळ घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे दैनंदिन जीवन : छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधान मंडळ यांच्या सोबत सल्लामसलत करून स्वराज्या संबंधित निर्णय व मोहिमा याची आखणी करत होते. स्वराज्याच्या कारभाराचा मध्यबिंदू म्हणजे स्वराज्यातील प्रजा होती. न्याय निवाड्याची कामे विना भेदभाव केली जात होती. जनता असो वा मंत्री सर्वांसाठी सारखेच नियम होते. गनिमी कावा म्हणजे काय? गनिमी कावा अथवा इंग्रजीत गुरिला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः बुद्धिमत्ता आणि उत्कृष्ट राजकीय कौश्यल्या यांच्या आधारे ऐतिहासिक "स्वराज्य" महाराष्ट्र राज्यातील रायगड या किल्ल्यावर स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य म्हणजे जनतेचे, रयतेचे राज्य आणि स्वराज्य स्थापन करून मराठा साम्राज्याची यशस्वी मुहूर्तमेढ रोवली.
छत्रपती शिवाजी महाराज हे बुलंद शौर्य, असामान्य धाडस आणि अचूक युद्धनीती साठी प्रसिद्ध आहेत.
जगविख्यात "गनिमीकावा" हा छत्रपती शिवाजी महाराज यांनीच युद्धात अमलात आणून मुगल आणि ब्रिटिश सैन्यास जेरीस आणले.
दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा हातात पट्टे चढवून युद्धात तांडव करतात...
छत्रपती शिवरायांच्या कांचनबारी युद्धाचे वर्णन करताना सभासद म्हणतो...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी अष्टप्रधान मंडळ यांची नावे खालील प्रमाणे आहेत :
पंत प्रधान मोरोपंत त्र्यंबक पिंगळे येर्ली [पेशवा] [वार्षिक पगार १५००० होन]
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पत्रलेखनीक आणि स्वराज्याचे चिटणीस बल्लाळ आवजी चित्रे [बाळाजी आवजी] होते
श्री रघुनाथ नारायण हणमंते स्वराज्यातील राज्यव्यवहारकोश मुत्सद्दी राजकारणी होते
श्री अर्जोजी यादव स्वराज्यातील रबांधकाम शिलेदार होते
स्वराज्यातील पहिल्या महिला सरसेनापती म्हणून श्रीमंत उमाबाई खांडेराव दाभाडे यांचे नाव आदराने घेतले जाते
श्री कृष्णाजी बनकर स्वराज्यातील शस्त्रगृहाचे तज्ञ होते
स्वराज्यातील पहिले पायदळप्रमुख सरनौबत पिलाजी राव गोळे होते व पायदळाची रचना अशी होती :
१० सैनिकांवर - १ नाईक महाराजांच्या सैन्याच्या पायदळत सुमारे १०५०० सैनिक होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून सरखेल कान्होजी आंग्रे यांना आरमार प्रमुख पदी नेमणुक केली:
१६९८ मध्ये कान्होजी आंग्रे यांनी स्वराज्याचा पहिला नाविक तळ विजयदुर्ग या सागरी किल्यावर स्थापन केला. विजयदुर्ग हा किल्ला मुंबई पासून केवळ ४२५ कि.मी. अंतरावर असल्याने त्या बंदरावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. विजयदुर्ग या किल्याला घेरिया या नावानेही ओळखले जाई. अखंड जहाज किल्याच्या आत घेण्याची सुविधा या किल्यात होती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे वयाच्या अवघ्या २७/२८ व्या वर्षी ५० पेक्षा जास्त युद्धनौका होत्या आणि संपूर्ण कारकिर्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संरक्षण ताफ्यात सुमारे ७०० युद्धनौका होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना भारत सरकारने भारतीय नौसेनेचे पिता [Father Of Indian Navy] असा सन्मान केला आहे. भारताचे पंतप्रधान यांनी सन २०२२ रोजी भारतीय नौदलाच्या नवीन चिन्हावर सेंट जॉर्ज क्रॉस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा शाही शिक्का समाविष्ट केला आहे. नवीन चिन्हावर वरच्या कॅन्टोनवर राष्ट्रध्वज आहे. राष्ट्रीय चिन्हासह निळा अष्टकोनी आकार एका अँकरच्या वर बसलेला असून जो नौदलाच्या बोधवाक्य असलेल्या ढालीवर उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळात गड किल्ले यांवरील अठरा कारखाने : गडावरील कारखाने म्हणजे खाती. ज्यासंबंधीचे जे खाते असेल त्याबाबतची जबाबदारी त्या कारखान्याकडे दिली जात असे. हे कारखाने अठरा असावेत असा संकेत आहे. अठरा का? तर अठरा ही संख्या भारतीयांची आवडती. पुराने अठरा. गीतेचे अध्याय अठरा. म्हणून बहुतेक कारखानेही अठरा. सर्वच गडावर सर्व अठरा कारखाने असत असे नाही. परंतु मुख्य गडावर ते असत. कारखाने हे दौलतीच्या मालकीचे असत. या कारखान्यांचे नाव पुढील प्रमाणे. यातील काही कारखान्यांची नावे त्यांची कार्ये सांगतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील राजधानी रायगडावरील १८ कारखाने व हिंदवी स्वराज्याचे १२ महल यांची अष्टप्रधान यांच्या कडे असलेली व्यवस्था
अठरा कारखाने: हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच हिंदू धर्म मुगल राजवटीमधून वाचला आणि संपूर्ण विश्वात वाढला. आग्र्याहून औरंगजेब याच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र युवराज संभाजी राजे यांनी स्वतःची धाडसी सुटका करून घेतली. त्यामुळे मुगल राजवटीविषयी संपूर्ण जगातील भीती नष्ट झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच हिंदू धर्माचे नाव समानता आणि न्यायासाठी घेतले जाऊ लागले. स्वराज्याची अंतिम रक्तरंजित लढाई:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील शेवटची मोहीम जालना स्वारी होती. दिलेर खानाने विजापूर शहराला वेढा दिला होता. त्यावेळी विजापूरकरांना मदत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, आनंदराव मकाजी आणि सिदोजी नाईक निंबाळकर यांच्या सह २० हजार सैन्य घेऊन विजापूर जवळील सलगर येथे थांबले होते. या सैन्याचे २ भाग करून त्यातील १० हजार सैन्याची पहिली तुकडी आनंदराव मकाजी यांच्या नेतृत्वाखाली देऊन त्यांना मोगली मुलुखात धामधूम करण्यासाठी पाठवले होते. १० हजार सैन्याची दुसरी तुकडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज दिलेर खानाचे लक्ष्य वेधण्यासाठी जालन्यापर्यंत प्रदेश लूटमार करीत ४ नोव्हेंबर १६७९ रोजी जालन्यात पोहोचले. जालना स्वारीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर सरदार सिदोजी नाईक निंबाळकरही आपले सैन्य घेऊन हजर होते.
जालना पेठ छत्रपती शिवाजी महाराज यांनी सतत ४ दिवस लुटली. अत्यंत श्रीमंत अशा पेठेत छत्रपती शिवाजी महाराज यांना सोने, रूपे, हत्ती व अगणित मालमत्ता सापडली. लुटीचे सामान घोडे उंटावर लादलेले होते. सर्व लुटी सह छत्रपती शिवाजी महाराज परत येत असताना मोगलांचे सरदार रणमस्तखान, आसफखान, जाब्दीरुखान, केसरीसिंग, सरदारखान व अन्य उमराव ८-१० हजार फौजे सह छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चालून आले. जालना स्वारीत आणलेली लूट व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीव धोक्यात आला असता स्वराज्याचे पंचहजारी सरदार नरवीर सिदोजी नाईक निंबाळकर यांनी मोगली सैन्याला थोपवून धरण्याचा मनसुबा बोलून दाखविला. सरदार सिदोजी निंबाळकर यांनी मोगलांशी सतत ३ दिवस प्रखर झुंज दिली. शत्रूला थोपवण्यात ते यशस्वी झाले परंतु इ. स. १८ ते २० नोहेंबर १६७९ रोजी अहिल्या नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीजवळ किल्ले पट्टाच्या [विश्रामगड] परिसरात स्वराज्याच्या अंतिम रक्तरंजित लढाईत स्वराज्याचे पंचहजारी सरदार नरवीर सिदोजी नाईक निंबाळकरआणि हजारो मावळ्यांनी आपल्या राजाला वाचवण्यासाठी धारातीर्थी लढता लढता बलिदान दिले.
छत्रपती शिवाजी महाराज व काही सैन्यांनी आणलेली लूट पट्टा किल्ल्याकडे घेऊन जाण्यास यशस्वी ठरले. छत्रपती शिवाजी महाराज २२ नोव्हेंबर १६७९ रोजी पट्टा किल्ल्यावर सुखरूप पोहोचले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची संपत्ती : इतिहासात अशी नोंद आहे कि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे उंची वस्त्राचे २००० बाल्स होते आणि छत्रपती कालीन विविध प्रकारचे चलन ७ लक्ष रुपये रोख स्वरूपात होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३२ मण सुवर्ण सिंहासनाची माहिती : ६ जून १६७४ शालिवाहन शके १५९६ आनंदनाम संवत्सर, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकासाठी ३२ मण सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांच्या हातात स्वराज्याची सूत्रे आली. संभाजी महाराजांच्या निधनानंतर राणी येसूबाई यांचे सन १६८९ साली औरंगजेब याचा सरदार झुल्फीकार नुसरत जंग यांच्या सोबत रायगड चे युद्ध झाले. सरदार झुल्फीकार याने राणी येसूबाई यांच्या सोबत तह केला आणि रायगड किल्ला तहात जिंकला व त्याचा वफादार अब्दुल रहीम खान याला रागडावरील संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले.
रायगडावर काम करत असलेल्या शेडगे कुटुंबामध्ये श्रीपती शेडगे यांच्याकडून (१९५६ पर्यंत) एक आख्यायिका सांगितली जात असे. त्याप्रमाणे सन १८१८ मध्ये रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर गडावरील सर्व लोकांना खाली नेण्याची व्यवस्था ९ सरदारांनी केली व शेवटी गडावर ९ सरदार राहिले. वाघजबडा या उतरण्यास अतिशय अवघड असलेल्या कड्यावरून त्या ९ पैकी ७ सरदार दोर लावून खाली उतरून त्यांनी अज्ञात ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३२ मन सुवर्ण सिहासन लपविले. सुवर्ण सिहासन लपवून ते ७ सरदार दोराच्या साह्याने गडावर येत असताना गडावर असेलेल्या २ सरदारांनी [खंडोजी आणि यशवंतराव] यांनी दोर कापून वर येणाऱ्या ७ सरदारांना ठार मारले. त्याकाळात वैयक्तिक स्वार्थासाठी चाललेली फंदफितुरी लक्षात घेता या ७ सरदारांपैकी कोणालाही मोह होऊन ते सिहासनाची जागा सांगतील म्हणून त्यान्ना उरलेल्या दोघांनी ठार मारले, असे ही आख्यायिका सांगते. छत्रपती
शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी
शहाजी भोसले [छत्रपती
शिवाजी महाराज] छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन १९ फेब्रुवारी १६३० [शिव जयंती] छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन संवत १६८६ फागुन वदि ३ शुक्रे उ. घटी ३०|९ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ छत्रपती
शिवाजी महाराज्यांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला [गाव-तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.] शिवाजी महाराजांच्या वडीलांचे नाव शहाजीराजे मालोजी भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंची नावे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन पंचांग नुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ शिवाजी महाराजांची उंची ५ फुट ६ इंच किंवा ५ फुट ७ इंच छत्रपती शिवाजी महाराजांचे वजन इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्यभिषेक वेळेस केलेल्या सुवर्ण तुलेत ७२.५७ किलो वजन भरले, सुवर्ण तुलेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे वजन १७००० सुवर्ण होन इतके होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे वजन जवळपास १.१ ते १.२ कि. [११०० ते १२०० ग्राम] छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव मोती, इंद्रायणी, विश्वास, रणबीर, गजरा, तुरंगी आणि कृष्णा छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्वानाचे नाव वाघ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक गुरु समर्थ श्री रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नींची नावे सईबाई शिवाजी भोसले [माहेरचे आडनाव-निंबाळकर/जिल्हा सातारा] सगुणाबाई
शिवाजी भोसले [माहेरचे आडनाव-शिर्के/जिल्हा रत्नागिरी] सोयराबाई
शिवाजी भोसले [माहेरचे आडनाव-मोहिते/जिल्हा कराड] पुतळाबाई
शिवाजी भोसले [माहेरचे आडनाव-पालकर/जिल्हा पैठण] लक्ष्मीबाई
शिवाजी भोसले [माहेरचे आडनाव-विचारे/जिल्हा रायगड] सकवारबाई
शिवाजी भोसले [माहेरचे आडनाव-गायकवाड/जिल्हा पुणे] काशीबाई
शिवाजी भोसले [माहेरचे आडनाव-जाधव/जिल्हा जालना] गुणवंताबाई
शिवाजी भोसले [माहेरचे आडनाव-इंगळे/जिल्हा कोल्हापूर] छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांची अपत्ये संभाजी [मुलगा] अंबिकाबाई
महाडिक [मुलगी] राणूबाई
पाटकर [मुलगी] सखुबाई
निंबाळकर [मुलगी] छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी सगुणाबाई यांची अपत्ये राजकुंवरबाई / नानीबाई [मुलगी] छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिसऱ्या पत्नी सोयराबाई यांची अपत्ये राजाराम [मुलगा] छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौथ्या पत्नी पुतळाबाई यांची अपत्ये माहिती उपलब्ध नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाचव्या पत्नी
लक्ष्मीबाई यांची अपत्ये माहिती उपलब्ध नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहाव्या पत्नी सकवारबाई यांची अपत्ये कमळाबाई [मुलगी] छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या सातव्या पत्नी काशीबाई यांची अपत्ये माहिती उपलब्ध नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठव्या पत्नी गुणवंताबाई यांची अपत्ये माहिती उपलब्ध नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुना छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी छत्रपती शिवाजी महाराज यांची नातवंडे छत्रपती संभाजी महाराज यांचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तबगार सैन्य, मावळे आणि बालपणीचे मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासात नोंद नसलेले कर्तबगार सैन्य, मावळे आणि बालपणीचे मित्र
तेलान्ग्राव
छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण वाचवण्यासाठी शूरवीर मावळ्यांनी लढ़लेले अजरामर युद्ध म्हणजेच पावनखिंडीची लढाई: करवीर [कोल्हापूर] शहराजवळील विशाळगडाच्या डोंगर रांगांमध्ये १३ जुलै १६६० रोजी पावनखिंडची लढाई झाली. या घनघोर युद्धात छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण वाचवण्यासाठी मराठा योद्धा नरवीर श्री. बाजीप्रभू देशपांडे आणि श्री. शंभूसिंग जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत बिजापूर राजवटीचा सिद्धी मसूद याच्या सोबत महायुद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर ठरल्याप्रमाणे पोहोचताच तोफांचा भडीमार करून महाराज सुरक्षित आहेत याची ग्वाही दिली. नरवीर श्री. बाजीप्रभू देशपांडे हे रक्तबंबाळ अवस्थेत सिद्धीच्या सैन्याशी युद्ध करीत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडावर सुखरूप पोहोचल्यानंतर अखेर नरवीर बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थ पडले. छत्रपती शिवाजी महाराजांचे यांच्या शब्दाखातर प्राणाची आहुती देणाऱ्या ७ शूर मावळ्यांनी लढ़लेली अजरामर लढाई म्हणजेच वेगात दौडलेले वीर मराठी सात: छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्युदिन ३ एप्रिल १६८० [वयाच्या ५० व्या वर्षी] छत्रपती शिवाजी महाराजांचे मृत्यू स्थळ छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षे जगले? ५० वर्ष १ महिना १४ दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचे वैशिष्ट्ये रायगड किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ १,३०० एकर आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा अन्वय : प्रतिपत् चंद्र लेख इव वर्धिष्णुः विश्ववन्दिता छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा मराठी अर्थ : १. प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल. २. प्रतीपदेच्या चंद्रा प्रमाणे वाढत जाणारी व विश्वात सर्वानी वंदलेली शहाजी पुत्र शिवाजी यांची ही मुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी विलसत आहे. ३. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे. ४. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी विश्वाला वंदनीय असणारी शहाजी राजेंचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उध्दारलेल्या शकतोन शतके प्रचलित असलेल्या १२ बलुतेदार जाती व्यवस्थांची नावे खालील प्रमाणे आहेत: बारा बलुतेदार हि आताच्या महाराष्ट्र राज्याच्या काही प्रदेशात ऐतिहासिकदृष्ट्या मुख्यतः शेतीमध्ये वापरली जाणारी १२ व्यापारांची एक आनुवंशिक ग्रामसेवक प्रणाली होती.
१. कुंभार छत्रपती शिवाजी महाराज यांनी उध्दारलेल्या शकतोन शतके प्रचलित असलेल्या १८ पघड जाती आणि अलुतेदार व्यवस्थांची व्यवस्थांची नावे खालील प्रमाणे आहेत:
पूर्वी खेडेगावांमध्ये म्हणजे ग्रामीन भागात पैशा ऐवजी वस्तु-विनिमय पद्धत अस्तित्वात होती या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. म्हणजेच शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकऱ्यांस व
इतरांस सेवा पुरवीत असत. यामध्ये जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार [नारू] तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार [कारू] असे म्हणत. हे गावाचे वतनदार असत आणि पिढ्यांपिढ्या तेच ठरावीक काम करीत. अलुतेदार हा अठरा जातींचा समूह आहे. यांचे महाराष्ट्रातील प्रमाण ३०% पेक्षा अधिक आहे, आणि हा इतर मागास वर्ग [ओबीसी] मध्ये मोडतो
१. कासार इंटरनेट वर मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्वाचे दस्तावेज जोधपूर, राजस्थान येथील मिठालाल व्यास यांच्याकडे असल्याचे पुण्याचे ज्योतिषतज्ञ पंडित रघुनाथ शास्त्री यांना समजले आणि याच महत्वाच्या दस्तावेजात छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मपत्रिका आहे: इंटरनेट वर मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज यांची वंशावळ खालीलप्रमाणे आहे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे नावाजलेल्या ९६
कुळी मराठा यांची यांची नावे, कुळ, उप कुळ व वंश माहिती ९६ कुळी मराठे कुळ क्रमांक मुख्य कुळ उप कुळ वंशावळी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे १ यादव/जाधव यादव, जाधव, कामटे, जालीन्धरे, खडतरे, पाठारे, घरत, साटम, तुपे,तानपुरे, घाग, जोगळे, अम्रिते, घोणे, जैनक. मुख्य श्री कृष्णा, नेमिनाथ, प्रद्युम्ना, लखुजी, जिजामाता. २ मोरे मोरे, मधुरे, देवकाटे, हरफाळे , धायबर, मराठे, दरेकर, देवकर, अडवले. मौर्य चंद्रगुप्त, बिंदुसार, अशोक, कुणाल, संप्राती, दशरथ. ३ भोसले भोसले, घोरपडे, कंक, मालुसरे, लोखंडे, उबाळे. होयसळ मालोजी, शहाजी, शिवाजी, संभाजी, शाहू महाराज. ४ सिसोदे सिसोदिया ५ चव्हाण चव्हाण,तावडे, गवाने, हांडे, पानसरे, रणदिवे, काळभोर, इसपुते, केदार. चव्हाण पृथ्वीराज ६ शेलार शेलार, शेळके, काळेकर, शेतागे, कुर्हाळे, म्हात्रे. कोल्हापूर शिलाहार जीमूतवाहन, गन्द्रादिया, गोंक, मारसिंग, भोज २रा. ७ कदम कदम, धुमाळ, फडतरे, वराडे, भिसे, बोराटे, देवरे, भालेकर, हिरे, पालांडे. कादम्ब मयुरवर्मन, सामंतभद्र, रविवर्मन, मलादेवी. ८ राठोड राठोड, खंडागळे, रायजादे, भोरे, मागमाले, सकपाळ, शिरसाट. यादव दंतिदुर्ग, कृष्णा, अकलंक, अमोघवर्ष, महावीराचार्य, जिन्सेन. ९ चालुक्य चालुक्य, चाळके, इंगळे, पिसाळ, रणनवरे, दुबळ, महाले. चालुक्य विनयादित्य, तैलाप्पा, सत्याश्रय, आयांना विक्रमादित्य, रविकीर्ती, त्रैलोक्य मल्ल. १० साळुंखे साळुंखे, पांढरे, पाटणकर, पाटोळे, शेवाळे, बाबर, पडवळ, मगर, रणधीर, रणपिसे, सोनवणे, गुंजाळ, लहाने, व्यवहारे, नवले, लोंढे. सोळंकी सिध्दराज, कुमारपाल, हेमचंद्राचार्य. ११ शिंदे दळवी, कडू, उपासे, नागावे, नागवडे, खराळे, जावळे, सावळे,जगताप, कानडे, कवाडे. १२ सावंत सावंत, वंजारे, गतड, कथोर, अधिकारी, काराने, शिवळ, कासके. शिलाहार निंबदेव १३ साळवी साळुव १४ लाड १५ निकम १६ अहिर १७ गंगनाईक गंगनाईक, महामुळे, पुढारे, धुमक, कावरे, दिजे, हाराने. गंग कोंगूवर्मन, अविनीत, दुर्विनीत, राचमल्ल १ला, राचमल्ल २रा, चामुंडराई. १८ पवार पवार, बागवे, इशारे, रेणुसे, जगधने, रसाळ, लांडगें, बने, रोकडे, चांदणे, खैरनार, माळवदे, वागाजे. प्रतिहार शरद पवार १९ गायकवाड २० मोहिते २१ कलचुरी कलचुरी, कचरे, गोबारे, वास्कर. कलचुरी खारवेल, बिज्जल. २२ महाडिक २३ माने २४ चुळके २५ आंग्रे २६ चांडाळे चंदेल २७ काकडे २८ राणे २९ घाटगे ३० जगताप ३१ ढमढेरे ३२ जगदाळे ३३ धावळे ३४ दाभाडे ३५ धुमाळ ३६ थोरात ३७ दळवी ३८ नलवाडे ३९ पानसरे ४० पिसाळ ४१ माळप ४२ फाळके ४३ अंगाने ४४ विचारे ४५ मालुसरे ४६ तावडे ४७ खैरे ४८ बागवे ४९ राऊत ५० रेणुसे ५१ वाघ ५२ पांढरे ५३ भोगले ५४ बागराव ५५ भागवत ५६ मुलीक ५७ सुर्वे ५८ क्षीरसागर ५९ शितोळे ६० ठाकूर ६१ शंकपाळ ६२ शिर्के ६३ तुवर ६४ मधुरे ६५ म्हाम्बर ६६ बंडे ६७ तेजे ६८ देवकाटे ६९ संभारे ७० संभारे ७१ हरफळे ७२ दरबारे ७३ कोकाटे ७४ ढेकळे ७५ थोटे ७६ पार्टे ७७ पालांडे ७८ फाटक ७९ जगधने ८० धायबर ८१ पिंगळे ८२ फडतरे ८३ भोवरे ८४ रसाळ ८५ खडतरे ८६ दाढे ८७ ढोणे ८८ मिसाळ ८९ पाठारे ९० बाबर ९१ भोईटे ९२ गवाने ९३ गवसे ९४ ढमाले ९५ पालव ९६ खंडागळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजरामर वीरकाळ : साम्राज्याला स्थापीत करण्याकरता किल्यांचे काय महत्व आहे याची महाराजांना नेमकी जाण असल्यामुळे वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी तोरणा, चाकण आणि कोंढाणा किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापलेल्या स्वराज्याच्या प्रदेशाची विभागणी १४ प्रांतात केली होती, त्यानुसार प्रांतवार किल्ल्यांची विभागणी खालील प्रमाणे आहे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ल्यांचे जीपीएस लोकेशन इंटरनेट वरुन मिळवलेली आहे त्यामुळे मुळ ठिकाणांपासून भिन्न असु शकतात. क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन मावळ प्रांत २] सातारा वाई प्रांत ३] प्रांत पन्हाळा ४] कोल्हापूर प्रांत १ १ सातारा १ १ कोल्हार २ २ २ खेळणा २ वडन्न
गड ३ ३ ३ ३ ४ ४ ४ ४ ५ ५ ५ ५ मृगम
गड ६ ६ ६ ६ आंबेनीराय
गड ७ ७ ७ ७ ८ ८ थाठवाडा ८ ८ ९ ९ ९ ९ नंदी
गड १० १० १० १० गणेश
गड ११ ११ ११ ११ खाल
गड १२ १२ १२ १३ १३ मंचक
गड १४ १४ प्रकाश
गड १५ १५ भीम
गड १६ १६ प्रेईंवार
गड १७ १७ सोमशेखर
गड १८ १८ मेदगिरीचेंन
गड १९ १९ २० बिदनूर
गड २१ मलकोल्हार
कोट २२ ठाकुर
गड २३ २४ २५ भूमंडल
गड २६ बिरुट
कोट क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन ५] कराड प्रांत ६] कोकण प्रांत ७] त्रिंबक प्रांत ८] बागलाण प्रांत १ १ मालवण १ १ २ २ २ २ ३ ३ ३ मनोहर
गड ३ ४ कसबा ४ जय
दुर्ग ४ थळा
गड ४ ५ ५ ५ ६ ६ ६ ७ ७ करोला ७ ८ ८ ९ ९ १० १० ११ ११ १२ १२ १३ १३ १४ १४ १५ १५ १६ १६ १७ १७ १८ १८ १९ १९ २० २० २१ २१ २२ २२ २३ २३ २४ २४ २५ २५ २६ सारंग
गड २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ मित्र
गड ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ ५६ ५७ ५८ क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन ९] वनगड प्रांत १०] प्रांत फोंडे बिदनूर ११] श्रीरंगपट्टण प्रांत १२] कर्नाटक प्रांत १ वनगड १ १ १ जगदेव
गड २ गहन गड २ कोट
काहूर २ कोट
गरुड २ सुदर्शन
गड ३ चिंम
दुर्ग ३ कोट
बाकर ३ प्रमोद
गड ३ रामन
गड ४ ४ कोट
ब्रह्मनाळ ४ ४ नंदी
गड ५ ५ ५ ५ ६ ६ ६ कोट
कुसूर ६ बहिर
गड ७ श्रीगदन
गड ७ कतार ७ कोट
ताळेगिरी ७ ८ ८ कलबर्ग ८ ८ महाराज
गड ९ महंत
गड ९ कोट
शिवेश्वर ९ ९ जवादी
गड १० १० १० १० मार्तंड
गड ११ ११ ११ त्रिपादपूरे ११ १२ १२ १२ कोट
दूटानेटी १२ गगन
गड १३ १३ लखनूर १३ १४ १४ कळप
गड १४ कस्तुरी
गड १५ १५ माहिनदी
गड १५ दिर्घपली
गड १६ पराक्रम
गड १६ रंजन
गड १६ १७ कनकादी
गड १७ १८ ब्रह्म
ग १८ शामल १९ १९ विराडे २० प्रसन्न
दुर्ग २० कोट
चंदमाल २१ हडपसर
गड २२ २३ २४ क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस लोकेशन १३] प्रांत वेल्लूर १४] चंदी प्रांत १ १ २ कोट
पाळणापट्टण २ ३ त्रिमल ३ कृष्णगिरी ४ त्रिवादी ४ मदोन्मत्त
गड ५ पाळे
कोट ५ आखुल
गड ६ कोट
त्रिकोन दुर्ग ६ काळा
कोट ७ ८ चांजीवरा
कोट ९ कोट
वृंदावन १० ११ १२ रसाळ
गड १३ कर्मट
गड १४ १५ मुख्य
गड १६ गर्जन गड १७ १८ १९ प्राणगड २० सामार
गड २१ २२ २३ दुभे
गड [डुबेरगड/डुबेरे] २४ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासात नोंद असलेल्या इतर किल्ल्यांची
नावे श्री. कृष्णाजी अनंत सभासद विरचित पुढील प्रमाणे आहेत: क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन क्रमांक किल्ल्यांची नावे + जीपीएस
लोकेशन १ ४१ शरगा
गड ८१ कोट
बोटगिरी १२१ २ कोट
लावट ४२ शेवल
गड ८२ कंबल
गड १२२ ३ कोट
केचर ४३ कांगरी
गड ८३ स्वरुप
गड १२३ तंजावर ४ ४४ महान
गड ८४ ढोला
गड १२४ ५ ४५ मत्त
गड ८५ बहुल
गड १२५ ६ सालोभ
गड ४६ ८६ महिंद्र
गड १२६ ७ ४७ महो
गड ८७ १२७ ८ नौबत
गड ४८ महातळी
गड ८८ शृंगलवड
गड १२८ ९ ४९ ८९ पवित्र
गड १२९ १० तानवडा ५० भिलवडी ९० सुमन
गड १३० ११ ठाकरी
गड ५१ ९१ १३१ १२ हरुष
गड ५२ ९२ मंदर
गड १३२ लालगडचंदी १३ मंडर
गड ५३ ९३ दही
गड १३३ कोट
त्रिचंदी १४ केदार
कोट ५४ वीर
कोट ९४ १३४ देवणापाटी
कोट १५ ५५ बळराज
कोट ९५ कपल
गड १३५ चिंताहार
कोट १६ कंकणी
गड ५६ पताका
गड ९६ हरिश्चंद्र
गड १३६ वृद्धाचल
गड १७ ५७ ९७ १३७ चवी
कोट १८ कैहात
कोट ५८ ९८ पिपल
गड १३८ निलसाजीत
कोट १९ कुडाळ
कोट ५९ कमर गड ९९ ढकुर
गड १३९ कर्नाटक
गड २० कडवरी
गड ६० १०० कोट
कोलारकदीम १४० चेलगडचंडी २१ कारडी
गड ६१ पट
गड १०१ दुर्गम
गड १४१ गर्व
गड २२ कोचना
गड ६२ १०२ मरस
गड १४२ कोंडंपरु
कोट २३ नागिरी
गड ६३ १०३ अहिनिज्या
दुर्ग १४३ कानपूर
गड २४ तारुगड ६४ १०४ कट्टर
गड १४४ काम
कोट २५ ६५ सुबकर
गड १०५ मेजकोल्हार
गड १४५ २६ ६६ नाक
गड १०६ १४६ भवानी
दुर्ग २७ ढाळ
गड ६७ १०७ १४७ दरपूर
कोट २८ ६८ कांचन
गड १०८ १४८ त्रिचनापूर
कोट २९ ६९ १०९ पडवीर
गड १४९ ३० रस्त्र
गड ७० ११० भंजन
गड १५० बागल
कोट ३१ ७१ प्रोढ
गड १११ मुखणगडकोटवेल १५१ राय
दुर्ग ३२ सुधाकर
गड ७२ बालेराजा ११२ भातुर १५२ विराट
कोट ३३ सुगाणा
गड ७३ ११३ पतनगदने
गड १५३ शिरोळ
कोट ३४ सामात्रा
गड ७४ ११४ केवळ
गड ३५ सेरगा
गड ७५ ११५ शिद
गड ३६ वेन्द्र
गड ७६ ११६ मद
गड ३७ वरुप
गड ७७ ११७ बिगेवाळुंग
गड ३८ विदाविद
गड ७८ सेवक
गड ११८ बहिरव
गड ३९ विश्वासी ७९ ११९ मनसंतोष
गड ४० ईश्वर
कोट ८० कठोर
गड १२० पद्म
दुर्ग
शिवाजी महाराजांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
इतक्यात बाजी घोरपडे शहाजीराजांच्याच सामने खडा ठाकला. शहाजीराजे क्षणभर चमकलेच. हा तर रक्ताचा भाऊबंद अन आपल्याशीच लढायला उठला आहे? वास्तविक ह्या इतक्या प्राणांतिक संकटात ह्याने आपली मदत करावयाची तर ती सोडून हा....... पण एक क्षणभरच हे विचार शहाजीराजांच्या मनात तरळले. अन दुसऱ्याच क्षणी त्यांची भवानी तलवार बिजली सारखी बाजीवर कोसळली. शहाजीराजांच्या मदतीला त्यांचा पुतण्या त्र्यंबकजी शरीफजी भोसले, योगाजी भांडकर, मेघाजी ठाकुर, दसोजी गवळी असे अनेक लढवय्ये धावून आले.
इकडे नभांगणात शुद्ध पौर्णिमा संपून वद्य प्रतिपदा लागली होती. चंद्राचे बळ त्याचे तेज आता कलेकलेने उतरत चालले होते. तर इथे रणांगणात शहाजीराजे थकत चालले होते. त्यांचे शरीर म्हणजे नुकत्याच उमललेल्या जर्द तांबड्या जास्वंदीसारखे दिसत होते. जखमातर इतक्या झाल्या होत्या की, गणती करणेच अशक्य होते. शहाजीराजांच्या रक्ताने अवघी रणभुमी लालेलाल झाली होती. शरीरातून इतके रक्त वाहून गेल्या कारणाने राजांचा युद्धाचा वेग कमी होऊ लागला होता. राजांची जिद्द तिळभरही कमी झाली नव्हती पण शरीर साथ देत नव्हते....... अन अखेरीस राजे धाडकन घोड्यावरून खाली कोसळले. अती रक्तपात झाल्याने राजांना भोवळ आली होती. ते बघताच बाजी घोरपड्यांनी अत्यानंदाने आरोळी ठोकली. इतक्यात पारडे फिरले. इतका वेळ राजांचा शत्रु म्हणून लढणारा बाळाजी हैबतराव वेगानी पुढे झाला आणि त्याने राजांच्या मस्तकावर आपली ढाल धरून त्यांचे रक्षण करण्यास सुरुवात केली. पण बाजी घोरपड्यांनी त्याला बाजुला ढकलुन बेहोष शहाजीराजांना कैद केले. व्वा रे! ही मर्दानगी! अहो केवढे कौशल्य बाजीचे की, त्याने बेशुध्द पडलेल्या शहाजीराजांना कैद केले.
२५ जुलै १६४८ मध्ये विजापूरच्या आदिलशहाच्या आज्ञेने मुस्तफाखान याने किल्ले जिंजीजवळ शहाजीराजांना कैद केले. शहाजीराजांना कैद करून त्यांच्या हातापायात बेड्या ठोकल्या. शहाजीराजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरास झाली. शहाजीराजे जिंजी जवळ असताना हजारो सैनिक शहाजीराजांच्या फौजेच्या रोखाने निघाले. खासा मुधोळकर बाजी घोरपडे, खंडोजी, अंबाजी, भानाजी, हे त्यांचे बंधू, याकुतखान, दिलावरखान, मसूद खान, वेदाजी भास्कर, राघो मंबाजी, बाळाजी हैबतराव, मंबाजी पवार, मंबाजी भोसले असे कितीतरी जण राजांवर धावून गेले. मुस्तफाखान मागे राहून सारे कारस्थान घडवून आणत होता.
शहाजीराजांना छावणीत नेण्यात आले आणि सर्वप्रथम त्यांच्या हातीपायी काढण्या चढवण्यात आल्या. कारण तेवढ्यात शहाजीराजे शुद्धीवर आले तर आपले कोणाचेच काही खरे नाही हे प्रत्येक जण जाणून होता. एकाचवेळी दिल्लीचा पातशहा आणि विजापूरचा आदिलशहा ह्नांना आपल्या तलवारीवर तोलून धरणारे महाराज शहाजीराजे केवळ दगाबाजीमुळे कैद झाले. काही वेळाने शहाजीराजे शुद्धीवर आले अन तेंव्हाच त्यांना आपल्याला कैदी बनविल्याचे लक्षात आले तर....
हा दिवस होता दिनांक २५ जुलै १६४८ बादशहा आदिलशहाने अलगत जिजाऊंच्या सौभाग्यावरच घाला घातला होता. शहाजीराजेंच्या कैदेनंतर अदिलशहाने बेंगलोर व कोंडाणा हस्तगत करण्यासाठी फौजा रवाना केल्या.बेंगलोरला शहाजीराजांचे जेष्ठ पुत्र संभाजी यांनी तर मावळात शिवाजी महाराज यांनी या दोन्ही ठिकाणाहून अदिलशहाच्या फौजा मागे हटवल्या. हे वर्तमान अदिलशहाला समजल्यावर पुढे काय करायचे याचा विचार अदिलशहाला पडला. तर मोगलाकडे वशिला लावून शहाजीराजे यांच्या सुटकेसाठी शिवाजीराजे यांनी प्रयत्न चालू केले. संभाजीराजे व शिवाजीराजे यांचे वजन पाहता, आपल्यावर कठीण प्रसंग ओढवेल हे आदिलशहाला पटताच हे प्रकरण समजुतीने मिटविण्याचे ठरवले आणि आदिलशहाने शहाजीराजांची गौरवपूर्ण सुटका केली. या सर्व प्रकारात शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला तह करून अदिलशहाच्या ताब्यात दिला.
सर्वांचे ऐकून एकांतात आणि शांतचित्ताने विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
यशासाठी सतत प्रयत्न करावे.
पूर्वीच्या योद्ध्यांना अनेक प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जावे लागले होते,
त्यामुळे अशा परिस्थितींना न घाबरता सामोरे जावे.
सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे.
असे अनेक उपदेश स्वामींच्या ‘दासबोध‘ या ग्रंथात पाहायला मिळतात.
आपल्या प्रजेचे मन महाराज ओळखत होते. प्रजेचे सुख-दुखः यांची जाणीव महाराजांना होती, म्हणूनच त्यांना जाणता राजा असे संबोधले जाते. महाराजांचे मावळे म्हणजे अठरापगड जातींतील लोक. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी कुणाशी भेदभाव केला नाही. सदैव स्त्रियांचा सन्मान आणि त्यांची रक्षा हे आपले आद्य कर्तव्य आहे असे छत्रपती शिवाजी महाराज मानत.
अखेर तो दिवस उजाडला ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते . . . . ६ जुन १६७४ ला काशी चे विद्वान भाट श्री. विश्वेश्वर भट्ट म्हणजेच 'गागा भट्ठ' यांनी हिंदु परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला आणि शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. . . संपुर्ण रायगड त्या दिवशी एखाद्या नवरीसारखा सजवण्यात आला होता. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी राजे सिसोदिया वंशातील क्षत्रिय आहेत, असे गागाभट्ट यांनी सिद्ध केले. फक्त क्षत्रिय संस्कारांचा लोप झाला होता, म्हणून त्यांनी वैदिक विधींनी छत्रपती शिवाजी राजांचे उपनयन करून पूर्वीच्याच विवाहित स्त्रियांशी पुन्हा समंत्रक विवाह लाविले. त्याबद्दल गागा भट्ट यांनी " राज्याभिषेक प्रयोग" नावाचा एक नवा ग्रंथही रचला.
महाराज केवळ शुर आणि युध्द निपुणच नव्हते तर ते एक उत्तम प्रशासक देखील होते.
शहाजीराजांनी निजामशाहीच्या अखेरच्या दिवसात ह्या पद्धतीचा वापर केला. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धनितीचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला.
गनिमी काव्याचे घटक :
१. नियोजन व अंमलबजावणी
२. समन्वय आणि नियंत्रण
गनिमी काव्यात या प्रमुख गोष्टी आहेत. त्यात सैन्य व्यवस्थापन तसेच वेळेचे व्यवस्थापनही अंतर्भूत आहे.
गनिमी काव्याचे हेतू:
१. शत्रूला घाबरविणे किंवा दहशत बसविणे.
२. शत्रूचे मानसिक खच्चीकरण करणे.
३. आर्थिकदृष्ट्या शत्रूला अपंग करणे.
४. कोंडीत पकडणे.
५. अशी परिस्थिती तयार करणे ज्याने तो शरण येण्यास बाध्य होईल.
६. शत्रूला लढाई मैदान सोडून पळून जावयास लावणे.
७. शत्रुसैन्याची फळी विस्कळीत करणे.
८. त्याला फसविणे.
९. चुकीची माहिती मुद्दाम पुरविणे.
१०. त्याची दिशाभूल करणे.
११. शत्रूला बेसावध करणे.
१२. आपण दुर्बल आहोत किंवा आपल्यात लढाईची हिम्मत नाही असे भासविणे.
१३. शरण येण्याची बतावणी करून एकदम आघात करणे.
१४. शत्रूला पाठलाग करावयास भाग पाडणे.
१५. लढाईचे क्षेत्र आपल्यास अनुकूल असे निवडून शत्रूला कसेही करून तेथे नेणे.
१६. शत्रूचे नुकसान करून दरारा निर्माण करणे.
१७. म्होरक्यास ठार करणे, ज्याने शत्रुसैन्यात गोंधळ माजतो.
“खासा राजा घोड्यावर बसून, बख्तर घुगी घालून, हाती पट्टे चढवून मालमत्ता घोडी, पाईंचे लोक पुढे रवाना करून आपण दाहा हजार स्वारानिशी सडे सडे राऊत उभे राहिले...
हे युद्ध झाले तेव्हा महाराजांचे वय साधारण ४० वर्षांचे होते. युद्धभूमीवर महाराज कसे दिसत होते, त्यांचा पेहराव कसा होता, अंगावर असणारे बख्तर घूगी, चिलखत, दांडपट्टा, शिरस्त्राण याचे वर्णन आपण कवी परमानंद यांनी शिवभारत काव्यातील उंबरखिंड लढाईच्या अध्यायात केले आहे. तसेच कांचन मांचन किल्ला परिसर, खुद्द शिवरायांची व मावळ्यांची आक्रमकता, युद्धावेळी हजारो घोड्यांच्या टापांनी उडालेल्या धुळीमुळे दिसणारा परिसर, मराठ्यांच्या पराक्रमापुढे मोगल सैन्याची उडालेली भंबेरी, महाराजांची ढाल बनून त्यांच्यासमवेत लढणारे सेनापती प्रतापराव गुजर व इतर सरदार मंडळी असे विस्तृत वर्णन शिवभारतात केले आहे.
मावळ्यांचा राजा दोन्ही हाती पट्टे घेवून शत्रूशी त्याच्याच मुलुखात समोरासमोर कसा लढला आणि त्याने शत्रूंची कशी दाणादाण उडवत विजय मिळवला.
पंत अमात्य रामचंद्र नीळकंठ [मजुमदार] [वार्षिक पगार १२००० होन]
पंत सचिव अण्णाजी दत्तो [सुरनीस] [वार्षिक पगार १०००० होन]
मंत्री दत्ताजीपंत त्र्यंबक [वाकनीस] [वार्षिक पगार १०००० होन]
सेनापती प्रतिशिवाजी नेतोजी पालकर [सरनौबत] [वार्षिक पगार १०००० होन]
पंत सुमंत रामचंद्र त्र्यंबक [डबीर] [वार्षिक पगार १०००० होन]
न्यायाधिश निराजीपंत रावजी [दिवाणी/फौजदारी] [वार्षिक पगार १०००० होन]
पंडितराव दानाध्यक्ष मोरेश्वर पंडित [सद्र-मुहतसिव] [वार्षिक पगार १०००० होन]
५ नाईकांवर - १ हवालदार
३ हवालदारांवर - १ जुमलेदार
१० जुमलेदरांवर - १ हजारी
७ हजारींवर - सेनापती (सरनौबत)
पायदळतील जुमलेदारास १० होन प्रतिवर्षी मिळत असत
सबनिसास ४० होन मिळत असत
हजारीस ५०० होन प्राप्ती होत असे
मुंबई जवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजी आंग्रे यांनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला
१७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली
[संदर्भ :- महाराष्ट्रदर्शन :- गो. नि. दांडेकर]
1) तोफखाना :- तोफा आणणे, नेणे, खरेदी करणे, फुटक्या तोफांची विल्हेवाट लावणे इत्यादी कामे तोफखान्याची असत.
2) पिलखाना :- हत्ती संबंधीची कामे या खात्यात होत.
3) उष्ट्रखाना :- म्हणजे उंट शाळा.
4) शिलेखाना :- म्हणजे चिलखते आणि शस्त्र ठेवण्याची जागा.
5) फरासखाना :- वस्त्र विषयक कामे या कारखान्यात होत. मानी सरदाराला गादी, तक्के, लोड, मानाची वस्त्रे हे सारे या कारखान्यातून पुरवले जाई.
6) कोठी :- पावसाळ्याच्या वेळी गडावरील वस्तीस लागणारे जिन्नस कोठीत साठवले जाई.
7)जिन्नसखाना :- किरकोळ जिन्नसांसाठी हा कारखाना वेगळा बनवला होता.
8) लकडखाना :- जळण्यासाठी लाकूड, मोळ्या साठवणे, वाटप करणे या खात्याद्वारे होत असे.
9) इमारतखाना :- गडावरील इमारतींची डागडुजी अथवा बांधकाम हा कारखाना करायचा.
10) बागकारखाना :- मंदिरातील पूजा, राजांची दैनंदिन कर्मकांडे आणि सणांना लागणारी फुले या खात्यातून मिळायची.
11) कुरणे :- गडावरील घोडे, बैलांना गवत व अन्न पुरवणे या खात्याद्वारे होत असे. हे खाते गडाखाली असायचे.
12) रथखाना :- गडावर रथ असायचेच अशातला भाग नाही. परंतु राज शिष्टाचार म्हणून राजधानीच्या गडावर रथ असायचा.
13) पेठ कारखाना :- दुकानांची व्यवस्था पाहणारा कारखाना म्हणजे पेठ कारखाना.
14) थट्टी :- म्हणजे घोड्यांची पागा.
15) जामदारखाना :- गडावरील संपत्तीची देखभाल येथे होत असे.
16) औषधीखाना :- नावाप्रमाणेच येथे आयुर्वेदिक औषधी जमा असतात.
17) पुस्तकशाळा :- हा कारखाना प्रत्येकच गडावर नसायचा. किल्ल्यावर कोणी विद्याव्यासंगी असल्यास पुस्तक शाळा असे.
18) खासगी :- पानदाने, पिकदानी, गंजीफा, सोंगट्याचे पट अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी येथे असे. इतर कुठल्याही कारखान्यात वस्तू मिळाली नाही तर शेवटी ती या खासगीत शोधावी असे म्हटले जाई.
[संदर्भ :- शिवाजी महाराजांचे राज्य, सिमा आणि प्रशासन. वि. त्र्य. गुणे - मराठ्यांचा इतिहास खंड पहीला]
१) खजिना
२) जवाहीरखाना
३) अंबरखाना (हत्तीचे सामान)
४) शरबतखाना (औषधे)
५) तोफखाना
६) दप्तरखाना
७) जामदारखाना (सर्वप्रकारची नाणी)
८) जिरातखाना शेती
९) मुतबकखाना
१०) उष्ट्रखाना
११) नगारखाना
१२) तालीमखाना
१३) पीलखाना
१४) फरासखाना
१५) अबदरखाना (पेये)
१६) शिकारखाना
१७) दारुखाना
१८) शरतखाना
बारा महाल हे राज्याच्या मालकीचे असत. दरुणी महालाच्या कामकाजासाठी दिवाण नेमला जात असे. चिटनीस फडणीस यांनी आपापल्या दरखाचे कागद लिहावे, त्यावर निशाणी जिन्ह दिवानाने करुन त्यास समजावुन हुजूर समक्ष मोर्तब करावे. पोतनिस यानी पोते जमा खर्च लिहावा. नंतर पेशकसी जमा करावे. पोतदार यांनी नाण्याची पारख करावी. आबदारखाना व सराफखाना चिटनीसाकडे. तसेच विडे, अत्तर, गुलाब, हारतुरे, फळफळावळ, खकुशबोई खरेदी जमाखर्च यानी करुन हिशेब दप्तरी गुजरावा. पागा जुमलेदार सरदार यानी कैद करुन दिली त्याप्रमाणे चालून सेनापती व प्रधान यांच्या समागमे कामे करावीत. अष्टप्रधान, शिवरायांचे चिटनीदासी अधिकारी, अष्टप्रधानांच्या कचेरीतील अंकित अधिकारी हे सर्व मिळुन दौरत होत असे. दौलतीची व महाराजांची खाजगीची खाती परस्पर सहकार्याने वागत. चिटनीसाचा हुद्दा अष्टप्रधान मंडळात समाविष्ट नाही. चिटनीस हा महाराजांचा मुख्य लेखक होता. राजमंडळात त्याचा समावेश होता. राज्यातील सर्व राजपत्रे लिहण्याचे काम त्याच्याकडे होते. राजकारण पत्राची उत्तरेही तोच लिहीत असी सनदा, दानपत्रे वगैरे महालास जाणारी यांचे लिखान फडनीसी जाबत्याप्राणे होत होते.
सुभेदारास देशाची किर्दी महामुरी म्हणजे जमीनीची लागवड व वसाहत करवुन सरकारचा नियत सारा गोळा करुन सुभ्याचे अथवा महालाच्या दिवान कचेरीत जमा करणे, हे त्याचे मुख्य काम असे. महसुलाच्या या लोकारुढ देशनिर्मीत विभागास महाल, तपे, तर्फ, कर्यात परगाना या नावांनी संबोधले जात. एक किंवा अधिक महाल मिळुन एक मामला अथवा सुभा होई. या सरकारी वसुलाच्या कामाकरीता देशमुखास एकंदर उत्पन्नावर शेकडा ५% मोबदला मिळे, त्यास हक्क किंवा मोईन म्हणत. मोठ्या महालांना तर्फेच्या ऐवजी प्रान्त अथवा परगाना म्हणत. महालावरील अधिकार्यास हवालदार म्हणत. त्याच्या बरोबर हिशेब पाहनारा मुजुमदार असे. त्यांना प्रत्येकी सालीना ३ ते ५ होनपर्यंत वेतन सालीना मिळे. गावोगावी फिरुन वसुली हावलदारास करावी लागे. देशकाची मदत तो घेई. थोडी शिबंदी महालात ही असे. त्यावर नाईक हुद्देदार असत. काही महालांच्या गावी बाजार भरीत व हरतह्रेच्या झालेल्या वस्तू मिळत. त्यांना महाल कसबा असे म्हणत. कसब्यास शेरे व महाजन व सरजोशी हे अधिकारी वतनी असत. महालांच्या गोत-सभेत बसण्याचा त्यांना हक्क असे.
बारा महाल:
1) पोते (खजिना)
२) सौदागर (माल)
३) पालखी
४) कोठी
५) इमारत
६) बहीर्ला (रथ)
७) पागा
८) शेरी
९) दरुणी (अन्तःपुर)
१०) थट्टी (खिलार)
११) टांकसाळ
१२) छबीन
पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचा विजयी भगवा झेंडा फडकावत ठेवला.
श्रीमंत बाजीराव बाळाजी भट [नानासाहेब पेशवे] यांनी सण १७२० ते १७४० या काळात हिंदवी स्वराज्याचा आणि हिंदू धर्माचा विजयी पताका संपूर्ण भारत भर पसरविला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे अधिक स्वरूपात उच्य दर्जाच्या तोफा, बंदुका, दारुगोळा, तलवारी, भाले आणि सर्व प्रकारचे हजारो युद्धसामग्रीचे तंबू होते. हा सर्व स्वराज्यासाठी अनमोल ठेवा होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य कोशात छत्रपती कालीन सुवर्ण होन आणि तांब्याची शिवराई २ नाणी चलनात होती.
छत्रपती कालीन सुवर्ण होन आणि तांब्याची शिवराई या चलनाच्या भोवती बिंदुमय वर्तुळ होती.
सुवर्ण होन यांच्या पुढील बाजूस "श्री राजा शिव" आणि मागील बाजूस "छत्रपती" लिहलेले होते.
एक सुवर्ण होन यांची किंमत ९७.४५% सोन्याचा कस नुसार छत्रपती कालीन ४ रुपये ३६ पैसे होती.
शिवछत्रपती राज्याभिषेक दिनी सण १६७४ साली एक होन यांचे वजन २.७ ते २.९ ग्रॅम होते.
एक सुवर्ण होन यांची किंमत आजच्या रु.५६,३४०/- रुपयांप्रमाणे रु.१६,३३८.६०/- आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सन १६७१-७२ अर्थसंकल्पामध्ये स्वराज्यातील २१ किल्ल्यासाठी १७५००० होन म्हणजेच आजचे रु.२८५,९२,५५,०००/- अशी तरतूद केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे छत्रपती कालीन ३ लक्ष सुवर्ण होन म्हणजेच आजचे रु.४९०,१५,८०,०००/- रोख होते.
चिटणीसांच्या उल्लेखाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३२ मन सिंहासन वड आणि औदुंबर सारख्या पवित्र वृक्षाच्या लाकडाने सिद्ध केले, त्यावर सोने आणि रत्ने यांनी सुशोभित केले.
इतिहासकार निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद नारायण बर्वे यांनी १६९९ साली संस्कृत भाषेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३२ मण सुवर्ण सिंहासन🚩 जे ८ सिंहांच्या पाठीवर स्थित केले आहे त्यांची नावे दिशेनुसार सांगितली आहेत :
पूर्व दिशेला सिंह आहे🚩
पश्चिम दिशेला मृगेंद्र आहे🚩
दक्षिण दिशेला पंचास्या आहे🚩
उत्तर दिशेला गजेंद्र आहे🚩
वायव्य दिशेला शार्दूल आहे🚩
ईशान्य दिशेला हरी आहे🚩
आग्नेय दिशेला हर्यक्ष आहे🚩
नैऋत्य दिशेला केसरी आहे🚩
अब्दुल रहीम खान याच्या मुगल सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३२ मन सुवर्ण सिंहासन जप्त करताना सुवर्ण सिंहासनावरील सर्व सोने-चांदी, हिरे, माणिक, मोती काढून घेतले. सुवर्ण सिंहासनावरील सोन्याचा काही भाग तुटत नव्हता, मुगल सैनिकांनी दुर्मिळ व अनमोल लाकडी सिंहासन तोडून सिंहासनास आग लावली आणि आगीच्या उष्णतेने सिंहासनात घट्ट बसलेले सोने वितळले.
वितळलेले सोने सिंहासनासाठी बनवलेल्या चौथऱ्यावर ओघळून आले, वितळलेले मौल्यवान सोने मुगल सैनिकांनी सिंहासनाच्या चौथऱ्यावरून खरडून काढले. आगीतून वितळलेले सोने ख्ररडण्याच्या खुणा आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूळ सिंहासनाच्या चौथऱ्यावर आहेत. अश्या प्रकारे औरंगजेब याचा सरदार झुल्फीकार नुसरत जंग यांच्या आदेशावरून अब्दुल रहीम खान याच्या मुगल सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३२ मन सुवर्ण सिंहासन जप्त करून संपूर्णतः लुटून नेले.
पेशवे यांच्याकडे रायगडाचा कारभार चालवण्याची व्यवस्था ३० ऑगस्ट १७७२ पासून आली, त्यानंतर पेशवे यांच्या कामकाजी कागदपत्रात सिंहासनाचा उल्लेख वेळोवेळो झालेला आहे. पेशव्यांनी १६ मार्च १७७३ मध्ये सिंहासनासाठी खरेदी केलेल्या कापडावर रुपये १६०८ आणि ८ आणे खर्च करण्यात आले होते. १७९७ साली कापड खरेदी करण्यासाठी पुन्हा रुपये २७३८ आणि ४ आणे खर्च करण्यात आल्याची नोंद आहे, परंतु ते छत्रपती शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक झालेले ३२ मन सुवर्ण सिंहासन आहे अशी नोंद विशेष नाही.
इतिहास अभ्यासक श्री. प्रणव कुलकर्णी यांच्या मूळ संशोधनावर व माहिती लेखात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिहा़सनाची माहिती खालील प्रमाणे आहे:
छत्रपतींची राजधानी रायगडाहून हलल्यामुळे रायगडाचे राजकीय महत्त्व कमी झाले होते. मात्र तरीही रायगडाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली होती. शिवकालीन दप्तरातील अनेक तत्कालीन कागदपत्रे याची पुष्टी देतात.
या कागदपत्रांत शिवछत्रपतींच्या सिंहासनाची व्यवस्था आढळते. इ.स.१७७३मध्ये पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चार खांब होते. सिंहासन गजनी, किनखाप, ताफता अशा बहुमूल्य कापडाने आच्छादिले जात असे.
१६ मार्च १७७३ रोजीचा सिंहासनाच्या कापडाच्या खर्चाचा हिशेब उपलब्ध आहे. एकूण १,६०८ रुपयांचे कापड २२८ रु. गजनी, २२० रु. ताफता, ८१२ रु. किनखाप, १६ रु. खारवे आणि ३३२ रु.ची मखमल अशा प्रकारे खर्ची पडले. सिंहासनाच्या बैठकीचा भाग व तलाव्याचा भाग यांस कापडण्यासाठी हा खर्च पडला.
खर्चास सरकारी मंजुरी मिळत असे. त्यानंतर बारा वर्षांनी हा सगळा वस्त्रसंभार जीर्ण झाल्यामुळे इ.स. १७८६-८७ मध्ये पुन्हा याच स्वरूपाचा खर्च झाला. नंतर १९ एप्रिल १७९७ रोजी पुन्हा सिंहासनाचा गलेफ तयार केला. यावेळी सिंहासनाच्या खांबास लाल मखमल वापरली होती. इ.स. १७९७ मध्ये सिंहासनास २,७३८ रुपयांचे कापड खर्ची पडले.
त्या कापडाचा तपशील असा, १,३९८ रु.चे किनखाप, ५३८ रु. गजनी, २०८ रु. ताफता, २५ रु. खारवा व ५७० रु.ची मखमल. हे कापड किती लांबीरुंदीचे लागले हेही गजवार दिले असल्यामुळे त्यावरून सिंहासनाची लांबीरुंदी अजमावता येते आणि ती आज सिंहासन म्हणून असलेल्या स्थलाच्या मोजमापाशी जुळते.
कागदपत्रांत सिंहासनाच्या कापडाची लांबी ५ गज ४ तसू (अदमासे १५ फूट २ इंच) व रुंदी ४ गज ४ तसू (अदमासे १२ फूट) दिलेली आहे. प्रत्यक्षात सिंहासनाच्या चौथऱ्याची लांबी १३ फूट व रुंदी १२ फूट आहे. अर्थात कागदांतील कापड अधिक आहे. पण ते सिंहासनावर घालायचे कापड आहे त्यामुळे ते साहजिकच सिंहासनापेक्षा मोठेच असणार. यामुळे सिंहासनाच्या चौथऱ्याची स्थाननिश्चिती होते.
’सिंहासन’ आणि ‘तख्त’ या दोन वेगवेगळ्या संज्ञा. सिंहासन म्हणजे तेरा फूट लांब व बारा फूट रुंद असा ओटा, आणि तख्त म्हणजे त्या ओट्यावरील राजाने स्वतः बसावयाचे आसन. या आसनावर शेला आणि गलेफ अशी दोन प्रकारची वस्त्रे घातली जायची. गलेफांतही दोन प्रकार होते.
सिंहासनावर चौखांबी मंडप होता. या मंडपाच्या खांबांना खारव्याचे अस्तर असलेल्या मखमलीचे वेष्टन असे व त्याचे माप नऊ गज म्हणजे २५ फूट होते.
या सिंहासनाच्या मंडपास छत म्हणजे झालर असलेला चांदवा लावलेला होता. हा चांदवा किनखापी, तर झालर ताफत्याची असायची. या किनखापी चांदव्यास गजनीचे अस्तर असे.
रोज संध्याकाळी सरकारी माणसे सिंहासनाजवळ जमून सिंहासनास मुजरा घालीत असत व तेथे दिवटी लावीत असत. येथे रात्री सतत दिवटी असे. गडावरच्या इतर काही ठिकाणांप्रमाणेच तख्ताजवळही रात्रभर दिवा जळत असावयाचा, असा शिरस्ताच (नियम) होता.
तख्ताजवळ मशालेस पोत म्हणूनही खर्च पडला आहे. या सिंहासनाची दररोज पूजा होत असे. त्याचा ‘तख्त पुजारी’ म्हणून ‘महाराजांचे तख्ताचे पूजेस फरास’ असा निर्देश आला आहे.
सिंहासनाच्या व्यवस्थेचा आणखी एक विशेष म्हणजे सिंहासनासमोर दरवर्षी कीर्तन होत असे. हे कीर्तन करण्याचे काम बिरवाडीच्या योगी घराण्याकडे वंशपरंपरागत होते. या कीर्तनकारांस जमीन इनाम दिली होती. हे कीर्तन प्रतिवर्षी निरनिराळ्या तिथींस होत असे.
उदाहरणार्थ, जन्माष्टमीचा उत्सव सिंहासनाजवळ होई. इ.स. १७७८ मध्ये या उत्सवास १५ रु. खर्च आला. या उत्सवास गोरेगावकर हरिदास बोलावीत. त्यास ५ रु. बिदागी मिळे.
सिंहासनाजवळ केवळ सिंहासनाचाच म्हणून नगारखाना इ.स. १७९७पासून नाना फडणिसांनी सुरू केला. यासंबंधीचा उल्लेख: ‘रा. बालाजी जनार्दन फडणीस माहाडास आले, ते तेथून किल्ला पाहण्यास आले ते समई शिवाजी महाराजांचे तख्ताजवळ नगारखाना ठेवावयाची परवानगी सांगितली त्यावरून सन सवा तिसैनापासून ठेविला’.
सन सवा तिसैन म्हणजे शके १७१८, इ.स. १७९७. या नगारखान्याच्या खर्चाची वार्षिक नेमणूक १,३०० रु. असे. नाना फडणिसांनी सिंहासनासमोर नगारखाना ठेवण्याची जी खास व कायमची व्यवस्था केली.
तिचे स्वरूप पुढीलप्रमाणे - २ सुर्णाजी, १ तुतारजी, २ कर्णाजी, २ दमामजी, १ डफगर, १ झांजवाला, २ घड्याळजी, ३ नगारजी व पेलेदार, १ नगारे करणार इतकी माणसे कायम नेमली. इ.स. १८०७-०८ मध्ये त्यांचे वार्षिक वेतन १,२०० रुपये इतके होते.
तख्तापुढे सिंहासनाचा म्हणून स्वतंत्र चौघडा होता व तो ठरावीक वेळी गर्जत असे. तख्तापुढे दरवर्षी एक बकरे बळी म्हणून दिले जाई. सिंहासनाजवळ राजहुडा होता व तेथे स्वतंत्र पहारा असे.
सिंहासनाच्या चौथऱ्याची जपणूक एखाद्या दैवताप्रमाणे होत असे. अशा प्रकारे एखाद्या जागृत व तेजस्वी देवस्थानाप्रमाणे रायगडावरील शिवछत्रपतींच्या राजसिंहासनाची व्यवस्था उत्तर पेशवाईत ठेवली गेली होती.
पुढे १८१८ साली इंग्रजांनी रायगडावर ताबा मिळवला तेव्हाही त्यांनी ३२ मन सुवर्ण सिंहासनावर कब्जा केल्याच्या कोणत्याच नोंदी इतिहासात आढळत नाहीत.
३२ मन सुवर्ण सिंहासनाची एक आख्यायिका:
छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३२ मण सुवर्ण सिंहासनामधले ३२ मण म्हणजे १२८० किलो सोने.
काय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा खरा इतिहास?
महाराज यांच्या राज्याभिषेकासाठी ३२ मण सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलेले. पोलादपूरच्या रामजी दत्तो चित्रे यांनी हे सिंहासन त्याकाळी घडवले.
त्यासाठी अत्यंत मौल्यवान रत्ने सिंहासनासाठी वापरली गेली. महाराजांच्या निधनानंतर त्या सिंहासनाचे पुढे काय झाले याविषयी जास्त नोंदी आढळत नाहीत.
३२ मण म्हणजे किती किलो? सध्या जसे वजन मोजण्यासाठी ग्रॅम या मापकाचा वापर होतो, तसा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मण किंवा शेर या मापकात वजनाचे मापण केले जायचे.
१ तोळा म्हणजे ११.७५ ग्रॅम
२४ तोळे म्हणजे १ शेर
(२४ तोळा x ११.७५ ग्रॅम = २८२ ग्रॅम म्हणजे १ शेर)
१६ शेर म्हणजे १ मण
(१६ शेर x २८२ ग्रॅम = ४,५१२ ग्रॅम म्हणजे १ मण)
(४,५१२ ग्रॅम म्हणजे ४.५ किलो)
४,५१२ x ३२ मण = १,४४,३८४ ग्रॅम म्हणजे १४४ किलो
१४४ किलो x रु.४५,२६,००१/- = रु.६५,१७,४४,१४४/-
(आजच्या बाजार भावानुसार २४ कॅरेट सोन्याची किंमत रुपये पासष्ट करोड सतरा लाख चव्वेचाळीस हजार एकशे चव्वेचाळीस आहे)
पण विशेषतः इतिहासकालीन नोंदीनुसार ३२ मण म्हणजे १४४ किलो असा उल्लेख आपल्याला आढळतो.
पण काही ठिकाणी १ मण म्हणजे ४० किलो असाही उल्लेख आढळतो.
४० किलोच्या अंदाजाने हिशोब केला तर ३२ मण म्हणजे १२८० किलो असाही हिशोब येतो.
त्यानुसार सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे:
आज सन २०२२ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति किलो रु.४५,२६,००१/- आहे.
१२८० [किलो सोने] x रु.४५,२६,००१/- [सोन्याचा आजचा बाजारभाव] = रु.५७९,३२,८१,२८०/-
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या "अनमोल" ३२ मण सुवर्ण सिंहासनाची किंमत पाचशे एकोणऐंशी करोड बत्तीस लाख एक्याऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये असेल
आणि याच ३२ मन सुवर्ण सिहासनाला हजारो नवरत्ने, रत्ने, माणिक, मोती, हिरे जडले असतील त्यांची किंमत वेगळीच जोडावी लागेल.
छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या विषयी विशेष माहिती
[सध्याचे इंग्रजी कॅलेंडर नुसार]
[जन्म कुंडलीनुसार]
राजा शिवाजी जन्म
---
[शिवकालीन प्रचलित मराठी कॅलेंडरनुसार]
त्याप्रमाणे जुन्या इंग्रजी कॅलेंडर नुसार ही तारीख आहे
६ एप्रिल १६२७
---
महाराष्ट्र शासनाने २००१ साली शिवरायांची स्विकारलेली जन्मतारीख
(शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या आईचे नाव :
राष्ट्रमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले
जेष्ठ्य पुत्र संभाजी शहाजीराजे भोसले
४ मुले-अपत्ये अल्पायुषी [निधन]
कनिष्ठ पुत्र छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या आईचे नाव :
तुकाबाई शहाजीराजे भोसले
पुत्र व्यंकोजी ऊर्फ एकोजी शहाजीराजे भोसले
पुत्र कोयाजी शहाजीराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या आईचे नाव :
नरसाबाई शहाजीराजे भोसले
पुत्रांची माहिती उपलब्ध नाही
श्री शिवछत्रपती ९१ कलमी बखर किंवा रियासत खंड १ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र भाऊ असा उल्लेख आहे :
संताजी शहाजीराजे भोसले
रायभान शहाजीराजे भोसले
इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र भाऊ "नाटक शाळा" असा उल्लेख आहे :
भिवजी शहाजीराजे भोसले
प्रतापजी शहाजीराजे भोसले
हिरोजी शहाजीराजे भोसले ऊर्फ हिरोजी फर्जंद
इंग्रजी कॅलेंडर नुसार ६ जुन १६७४, रायगड
दुसरा राज्याभिषेक २० जुन १६७४, रायगड
दुर्गराज श्रीरायगडावरील शिलालेखात राज्याभिषेकाची नोंद ही #तिथीनुसार
जेष्ठ शुद्ध त्रयोदशी 🚩
शके १९४६ शिवशक ३५१ प्रारंभ
म्हणजेच
फिरंगी दिनांक २० जून १६७४
[इंटरनेट वरील उपलब्ध माहिती नुसार]
दिपाबाई [मुलगी]
येसूबाई [पिलाजी शिर्के यांची कन्या]
छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी
जानकीबाई गुजर
ताराबाई मोहिते
राजसबाई कागलकर घाटगे
अंबिकाबाई
शाहू महाराज [सातारा]
छत्रपती राजाराम महाराज यांची मुले
शिवाजी राजे [दुसरे] [आई-ताराबाई]
संभाजी राजे [दुसरे] [आई-राजासबाई]
सरनौबत सरसेनापती श्रीमंत येसाजीराव कंक
शूर कृष्णाजी येसाजीराव कंक
सरसेनापती हंबीरराव मोहिते
सरसेनापती बाजी पासलकर
सरनौबत म्हालोजी घोरपडे
सरसेनापती संताजी घोरपडे
सरसेनापती धनाजी जाधव
सरनौबत नेताजी पालकर
सरनौबत पिलाजी गोळे
सरलष्कर सिधोजीराजे नाईक निंबाळकर
आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे
सुभेदार दादोजी कोंडदेव
पावनखिंडवीर सरदार बाजी प्रभू देशपांडे
पावनखिंडवीर शूर फुलाजी प्रभू देशपांडे
पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
शूरवीर राणोजी उर्फ एकोजी शिरोळे
सरदार कोंडाजी फर्जंद [किंदाजी फरझंद]
नरवीर मुरारबाजी देशपांडे [महाडकर]
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे
नरवीर सूर्याजी मालुसुरे
मराठा सैन्यानी आनंदराव मकाजी भोसले
प्रतापगड युद्धवीर सहस्त्री सरदार रामजी पांगेरे
प्रतापगड युद्धवीर शूर चिमणाजी देशपांडे
प्रतापगड युद्धवीर नारायण
प्रतापगड युद्धवीर केसो नारायण देशपांडे
सरदार खंडोजी नाईक (गेरू सरनाईक)
किल्लेदार फिरंजोगी नरसाळे
अंगरक्षक जोत्याजी केसरकर
(संभाजीराजे सुटका मोहीम धारातीर्थी)
सरदार तुळाजी देशमुख
(संभाजीराजे सुटका मोहीम धारातीर्थी)
आप्पशास्त्री दिक्षीत (संभाजीराजे सुटका मोहीम धारातीर्थी)
हरबा वडार (संभाजीराजे सुटका मोहीम धारातीर्थी)
शूर जिवलग सूर्याजी काकडे
शूर रायाजी बांदल
कृष्णाजीराजे नाईक-बांदल
बाजी कृष्णाजीराजे बांदल
रायाजी कृष्णाजीराजे बांदल
सरदार कोयाजी बांदल
दिपाबाई बांदल
गुप्तचर प्रमुख बहिर्जी नाईक
राजनैतिक सल्लागार सोनोपंत [सोनोजी] विश्वनाथ डबीर
अंगरक्षक महाशक्तिशाली रणमर्द सरदार संभाजी कावजी [कोंढाळकर]
अंगरक्षक जीवा महाले
मर्द मावळा शिवा काशीद
सरदार हिरोजी इंदळकर
कवि भूषण रत्नाकर पंडीत
रामशेज किल्लेदार सूर्याजी जेधे
बाजी सर्जेराव जेधे
नागोजी जेधे
मताजी जेधे
सरदार गोदाजी राजे जगताप
शूर बलिदानी सिद्दी वहाब
[आफ्रिकन मुसलमान सिद्धी हिलाल पुत्र]
यल्लाजी शंकर गोठे [येल्या मांग]
[मांग जातीतील पहिले धारातीर्थ वीर]
दर्यावीर लायजी पाटील
नारो-बापूजी मुदगल देशपांडे
सरदार रुपजी भोसले
सोमाजी मोहिते
विठोजी शिंदे
विठ्ठल पिलदेव
विसोजी बल्लाळ
दक्षिण दिग्विजय वीर मानाजी मोरे
अंगरक्षक दलाचे प्रमुख सरदार बाबाजी ढमढेरे
पिलाजीराव सणस देशमुख
हैबतराव शिळीमकर
सुभानराव शिळीमकर देशमुख
संताजीराव शिळीमकर
संताजीराव प्रतापराव शिळीमकर
नाईक देशमुख निवगणे
जैताजी नाईक करंजावणे
आढळराव बाबाजी डोहर धुमाळ
सरनोबत सिधोजी थोपटे
झुंजारराव मरळ
कृष्णराव मालोजीराव शितोळे देशमुख
सरनोबत नागोजीराव कोकाटे
श्रीमंत राऊतराव ढमाले
श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव
सप्तसहस्त्री सरदार शिवाजी इंगळे
भिवाजी वाघ
भिकाजी चोर
भैरुजी चोर
संभाजी काटे
राणोजीराव चव्हाण
महाशक्तिशाली सरदार संभाजी काटे
गरुड देशमुख
शिदोजी नाईक निंबाळकर
सरसेनापती श्रीमंत हरजीराजे महाडिक
सरदार वाघोजी तुपे
कृष्णाजी पवार
सरदार जिवाजी सुभानजी रणनवरे
शूरवीर कोंडाजी रामजी शेलार [तानाजी मालुसुरे यांचे मामा]
स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे पाटील
स्वराज्याचे शिलेदार सरदार डिंबळे सरपाटील
श्रीमंत तापकीर पाटील सरदार
प्रतापगड युद्धवीर सहस्त्री सरदार कोंडाजी वरखडे
सखो कृष्ण लोहकरे
दादाजी कृष्ण लोहकरे
स्वामिनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस
सोनाजीराव पासलकर
बापूजीराव पासलकर
गोरखराव पासलकर
वीर सरदार मालोजी भिलारे
सरदार मांढरे
तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक
रामशेज किल्लेदार रंभाजी पवार
संग्रामराजे बांदल देशमुख
सरलष्कर खंडोजी दरेकर
कडू शिक्केकरी
सरदार काळे
सरदार निंबाजी पाटोळे
सरदार शामाखान
सरदार तेलंगरा
शिलेदार व सुभेदार रामाजी गडदरे
शिलेदार व सुभेदार जानराव वाघमारे
शिलेदार व सुभेदार अमरोजी पांढरे
शिलेदार व सुभेदार बहिर्जी वडगरे
शिलेदार व सुभेदार खंडोजी आटोळे
शिलेदार व सुभेदार बळवंतराव देवकाते
शिलेदार व सुभेदार देवाजी उघडे
अरमार दलाचा प्रमुख दौलतखान
तोफखानाप्रमुख इब्राहिम खान
शरीररक्षक सिद्दी इब्राहिम
पायदळाचा पहिला प्रमुख नूरखान बेग
वेणकोजी खांडेकर
धनाजी शिंगाडे
बनाजी बिर्जे
येसाजी थोरात
हिरोजी शेळके
भगवानराव देवकाते
माणकोजी धनगर
माधोजी पांढरे
गोडजी पांढरे
इंद्राजी गोरड
नाइकजी पांढरे
येसाजी काटकर
संताजी जगताप
निंबाजी पटोले
जेतोजी काटकर
बाळोजी काटकर
परसोजी भोसले
निलोजी काटे
तुकोजी निंबाळकर
गोन्द्जी जगताप
संभाजी हंबीरराव
शामखाना
राघोजी शिर्के
हरजी निंबाळकर
भवानराव
आनंदराव हशम हजारी
प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक
चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते
व्यंकट राऊ खांडकर
खंडोजी जगताप
उदोजी पवार
रामजी काकडे
कृष्णाजी घाडगे
सावजी मोहिते
नागोजी बल्लाळ
गणेश शिव्देव
चंडो हिर्देव
नेमाजी शिंदे
संक्रोजी माने
रामजी जनार्दन
राघो बल्लाळ
बळवंतराव देवकाते
बहिर्जी घोरपडे
मालोजी थोरात
रामजी भास्कर
बायजी गडदरे
बालाजी नीलकंठ
त्रिंबक विठ्ठल
महादजी नारायण
बाळोजी शिवतरे
माधोजी थोरात
कृष्णाजी भांद्डे
चांदी नारायण
खेम्नी
खंडोजी आवळे
बालाजी बहिरव
गणेश तुकदेव
केरोजी पवार
उचले
नरसोजी शितोळे
गणोजी दरेकर
मुग्बाजी बेनमणा
मालसावंत
विठोजी लाड
इंद्रोजी गावडे
जावजी महानलाग
नागोजी प्रल्हाद
पिलाजी गोळे
मुधोजी सोनदेव
कृष्णाजी भास्कर
कल्धोंडे
हिरोजी मराठे
दत्ताजी इडीतूलकर
पिलाजी सणस
जावजी पाये
भिकाजी दळवी
कोंडाजी वडखले
त्रिंबकजी प्रभू
तानाजी इंदुस्कर
तान सावंत मावळे
महादजी फर्जंद
येसाजी दरेकर
बलाजीराव दरेकर
सोन दळवे
चान्गोजी कडू
हणमंतराव खराटे
हिरोजी इंगले
भिमाजी वाघ
वरखडे बंधु
हिरोजी फर्जंद
आऊजी बाळाजीपंत चित्रे
सोमाजी दत्तो पभ्रुणीकर
अनाजी दत्तो पभ्रुणीकर
साबुसिंघ पवार
समाने घराणे
रामचंद्रपंत अमात्य
त्र्यंबकजी शरीफजी भोसले [शौर्यवीर शहाजी राजे अटक-शहाजी राजे यांचा पुतण्या]
योगाजी भांडकर [शौर्यवीर शहाजी राजे अटक]
मेघाजी ठाकुर [शौर्यवीर शहाजी राजे अटक]
दसोजी गवळी [शौर्यवीर शहाजी राजे अटक]
किल्ले महिपतगडाचे हवालदार दसमाजी नरसाळा
किल्ले सज्जनगडाचे हवालदार जिजोजी काटकर
रामदास गोसावी
सरदार नथाजी धुमाळ
सरदार लखोजी धुमाळ
खंडोजी जेधे
हणमंतराव जेधे
सुर्याजी जेधे
मुळवे
नरसो येसाजी
शामजी येसाजी
व्यंकाजी दादाजी कारभारी
जानो सिवदेव कारभारी
वरवाजी घोलप
धुल माहाल
सुभानजी कोढालकर
तुकोजी रणडावला
बकाजी सणस
सुबाजी तुपा
सीवाजी भडाक मोकदम, आंबवडे, चिखलगाव
बणाजी धोडा
बापू धोडा
साबाजी विलेकर मौजे वडतुबी, कोरल
अनाजी चिमणा
जिवाजी चिमणा
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी शिवाजी महाराज यांना समर्थन देणारे:
शिलेदार मारणे
शिलेदार ढोर
शिलेदार ढमाले
शिलेदार मराळ
शिलेदार शिळीमकर
शिलेदार देशमुख
सरदार बाजीराव हणगोजी बर्गे
सरदार सुभानजी मेगोंजी बर्गे
सरदार रखमाजी सुभानजी बर्गे
सरदार जानकोजी नाईकजी बर्गे
सरदार संताजी सिदूजी बर्गे
सरदार काशीबा खंडोजी बर्गे
सरदार शंकराजी बर्गे
सरनौबत तुळाजी लिंबाजी बर्गे
सरदार ख॔डेराव तुळाजी बर्गे
सरदार आनंदराव सुलतानजी बर्गे
सरदार बळवंतराव आनंदराव बर्गे
सरदार गणपतराव आनंदराव बर्गे
सरदार भगवंतराव तुळाजी बर्गे
सरदार मनाजी तुळाजी बर्गे
सरदार गिरजोजी खंडेराव बर्गे
सरदार राणोजी सटोजी बर्गे
सरदार पिराजी सटोजी बर्गे
सरदार रायाजी राणोजी बर्गे
सरदार येशवंत रायाजी बर्गे
सरदार त्रिबकजी जयवंतराव बर्गे
सरदार सेखोजी बापूजी बर्गे
सरदार सिदोजी सुलतानजी बर्गे
सरदार आप्पाजी जिवाजी बर्गे
सरदार बहीरजी खेत्रोजी बर्गे
सरदार म्हाळोजी जानोजी बर्गे
सरदार जोत्याजी बगाजी बर्गे
सरदार बर्हिजी महिपती बर्गे
सरदार लखमोजी बर्गे
सरदार सुभानजी बर्गे
सरदार सखाराम बर्गे
सरदार येसाजी सेकोजी बर्गे
सरदार सयाजी व्यंकोजी बर्गे
सण २४ फेब्रुवारी १६७४ रोजी सरनोबत प्रतापराव गुजर म्हणजेच मावळा तुकडोजी यांनी शरण येऊन जीवदान मिळालेला अफगाण पठाण अब्दुल करीम बहलोल खान उर्फ दुसरा अफजल खान चाल करून येत आहे, असे समजताच प्रतापराव गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या लेखी आदेशाखातर फक्त ६ मावळे घेऊन बहलोल खान याच्या १५००० गनीम सैन्यावर तुटून पडले.
प्रतापरावांनी आनंदराव मकाजी आणि हंसाजी मोहिते यांच्या १२०० सैन्याची वाट न पाहता आपल्या ६ अंगरक्षकांसह रागाने लालबुंद होऊन दोन टेकड्यांमधील अरुंद खिंडीत बहलोल खानचा सामना करण्यासाठी निघाले. स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता ७ मावळे बहलोल खानच्या अफाट सैन्याला थेट भिडले. हजारो गनिमांचा कत्तली करीत त्यांना वीरमरण आले आणि ते ७ मावळे शिव इतिहासात अजरामर झाले.
प्रतापराव गुजर [खरे धारातीर्थ]
विसाजी बल्लाळ [अनिश्चित माहिती]
दिपोजी राऊतराव[अनिश्चित माहिती]
विठ्ठल पिलाजी अत्रे[अनिश्चित माहिती]
कृष्णाजी भास्कर [अनिश्चित माहिती]
सिद्दी हिलाल [अनिश्चित माहिती]
विठोजी [अनिश्चित माहिती]
किल्ले रायगड
रायगड किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ५६६२८०००.०१३०००००४ स्क्वेअर फूट आहे
रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून १,३७६ मीटर उंचावर आहे किंवा
रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून ४,५१४ फूट उंचावर आहे
रायगडाला २००० पायऱ्या आहेत
रायगडाचे पायथ्यापासुन माथ्यापर्यंत अंतर ३.५ कि.मी आहे
शाहसूनः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते
२. कोळी
३. गुरव
४. चांभार
५. मातंग
६. मुलान/तेली
७. न्हावी
८. परीट/धोबी
९. माळी
१०. महार
११. लोहार
१२. सुतार
२. कोरव
३. गोंधळी
४. गोसावी
५. घडसी
६. ठाकर
७. डवऱ्या
८. तराळ
९. तांबोळी
१०. तेली
११. भट
१२. भोई
१३. माळी
१४. जंगम
१५. वाजंत्री
१६. शिंपी
१७. सनगर
१८. साळी
आबाजी सोनदेवांच्या मदतीने मुल्ला अहमदच्या ताब्यात असलेले ठाणे, कल्याण आणि भिवंडीच्या किल्ल्यावर ताबा मिळवला. यामुळे आदिलशाही साम्राज्याला हादरे बसु लागले . . .
छत्रपती शिवाजी महाराज यांना रोखण्यासाठी त्यांचे वडील शहाजी राजे यांना बंदी बनविण्यात आले . . . . पुढे जवळ जवळ ७ वर्ष महाराजांनी आदिलशहावर थेट आक्रमण केले नाही. तो काळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली सेना (संख्याबळ) वाढवण्यात आणि इतरां सोबत संबध दृढ करण्यावर खर्च केला.
माहिती नुसार शिवाजी महाराजांनी सुमारे ४२२ हून अधिक किल्ले जिंकले. त्यापैकी शिवनेरी किल्ला, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, राजगड, तोरणा, पन्हाळा, पुरंदर, लोहगड, सिंहगड, प्रबलगड, स्वर्णदुर्ग यांसारखे असंख्य किल्ले शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्यासाठी जिंकले, असा उल्लेख एका बखरी मध्ये आहे.
चिटणीस बखर आणि शिवदिग्विजय यांच्या बखरीतील संदर्भानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवघ्या ३५ वर्षात ४२२ किल्ले जिंकले. सर्वात महत्वाचे असे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी १११ किल्ले स्वतः बांधले.
१]
केळणा
रत्नागिरी [रत्नदुर्ग]
शाळा व महाविद्यालये
चित्रपट
स्टेडियम
इतर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा