महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले महाराज
यांच्या ४२२ किल्ल्यांचा "पुनर्विकास" आणि "संवर्धन" करण्यासाठी विशेष व
अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त "शिव संकल्प🚩" माहिती संस्था स्थापन
करण्याची आवश्यकता आहे. किल्ल्यांच्या पुनर्विकास आणि संवर्धन या
कामासाठी शिव संकल्प🚩 संस्थेच्या प्रत्येक शिवसेवक/शिवसेविकेने कमीत कमी
रु.१/- देणगी जमा केली तर वार्षिक रु.१५,९९,७०,५८९/- (रुपये पंधरा करोड
नव्यान्नव लाख सत्तर हजार पाचशे एकोणऐंशी) एवढा निधी आपण स्वतः सभासद जमा
करू शकतो.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा
पुनर्विकास आणि संवर्धन करण्यासाठी गरज का आहे?🚩
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचे
पुनर्विकास आणि संवर्धन कसे करावे?🚩
४२२ किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांनी एवढ्या उंच डोंगरावर का बांधले
असतील?
या सर्व प्रश्नांची माहिती संक्षिप्त स्वरूपात खाली अधोरेखित केली
आहे.
नासा या अमेरिकन आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेने दिलेल्या
अहवालानुसार भविष्यात ग्लोबल वाॅर्मिंगच्या परिणामांमुळे पृथ्वीवरील
बहुतांश सर्व बर्फ वितळणार आहे.
सण २०५० पर्यंत समुद्राचे पाणी सध्याच्या पातळीपेक्षा १ मीटर पर्यंत
वाढणार आहे.
सण २१०० पर्यंत समुद्राचे पाणी सध्याच्या पातळीपेक्षा २ मीटर पर्यंत
वाढणार आहे आणि
सर्वात शेवटी सण ५००० पर्यंत पृथ्वी वरील सर्व बर्फ वितळून जाणार व
समुद्राचे पाणी सध्याच्या पातळीपेक्षा ७० मीटर पर्यंत वाढणार आहे.
त्यामुळे जगातील समुद्राच्या तटावरील जवळपास सर्वच शहर आणि भुभाग
पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्याखाली जाणार आहेत, या विषयी अधिक माहिती
इंटरनेट वर उपलब्ध आहे
सण ५००० मध्ये समुद्राच्या पाण्याखाली पुर्णतः बुडणा-या शहारांमध्ये भारत
देशातील मुंबई, नवी मुंबई व ठाणे, तटीय रायगड विभाग अंशतः, तटीय कोकण
विभाग अंशतः तसेच तटीय गुजरात, केरळ, चेन्नई, कलकत्ता व इतर तटीय
शहारांचाही समावेश होतो.
सण ५००० मध्ये पश्चिम भारताच्या जमीनीची सुरुवात खंडाळा-लोणावळा येथील
पुणे जिल्ह्याने होईल, इगतपुरी येथून नाशिक जिल्ह्याच्या जमीनीची सुरुवात
होईल आणि कोकण विभागाच्या जमीनीची सुरुवात महाबळेश्वर, कराड सातारा,
कोल्हापूर आणि डोंगराळ भागाने होईल.
वैश्विक तापमान बदलाप्रमाणे भूगर्भातील घडामोडी सुद्धा मानवी जीवनावर
प्रभाव टाकू शकतात. अधिक माहितीसाठी खालील विडिओ पहावे.
सांगायचे तात्पर्य असे आहे की भविष्यात येणारी जल आणि भूगर्भिय दुर्घटना
टाळता येऊ शकत नाही, परंतु आपण सर्व शिवसेवक/शिवसेविकांनी एकत्र येऊन
महाराष्ट्रातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीचे महत्व
सांगूया. भविष्यात होणाऱ्या जलदुर्घटनेचे महत्व ओळखून छत्रपती शिवाजी
महाराज यांनी सपाट जमिनीवर मोठे मोठे महाल उभे करण्याच्या ऐवजी उंचच्या
उंच डोंगर कपारीत अदम्य साहसाने किल्ले बांधले. आपल्या राजाने ४०० वर्ष
आधीच आपल्या जनतेची, आपल्या रयतेची सुरक्षा करून ठेवली आहे; अश्या
भविष्यवेधी राजा शिवछत्रपतीस मानाचा मुजरा.🚩
आनंदाची वार्ता अशी कि, नासाच्या अधिकृत संस्थेने डॉक्युमेंटरी मध्ये
सांगितल्याप्रमाणे पृथ्वीचे आयुष्मान १७५,००,००,००,००० वर्ष [एकशे
पंच्याहत्तर करोड] आहे आणि
इंटरनेट वरील मिळालेल्या माहितीनुसार मनुष्याचे पृथीवरील अस्तित्व
८३,५६,२९,५०,००० वर्षे पर्यंत असेल.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांना
पुनर्विकास आणि संवर्धन करण्यासाठी गरज आहे, म्हणून किल्ल्यांच्या
पुनर्विकासाचे महत्व पटवून देऊया.
|| व्हॉट्स ऍप नं. +९१ ९२८४७२६१६७ || ई-मेल ऍड्रेस: शिवसंकल्पकिल्लेपुनर्विकास@जीमेल.काॅम ||
प्रस्तावना
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
|| शिवराज्याभिषेक गीत ||
|| शिवगर्जना गारद ||
Popular Posts
-
🚩|| छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो ||🚩 शिव संकल्प🚩किल्ले पुनर्विकास आणि संवर्धन माहिती संस्था -: महत्वाची सूचना :- शिव संकल्प ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा